ज्या घरामध्ये स्त्रिया ही 7 कामे करतात त्या घरामध्ये पैसा कधीच टिकत नाही..!

ज्या घरामध्ये स्त्रिया ही 7 कामे करतात त्या घरामध्ये पैसा कधीच टिकत नाही..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो स्त्रिया या साक्षात लक्ष्मीचं रूप असतात. आपल्या घरात स्त्रीच वास्तव्य म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत असते. आणि या स्त्रियांनी काही नियमांचं पालनही करायला हवं.

शास्त्रानुसार स्त्रिया घरात या सात चुका करतात त्या घरात माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही, लक्ष्मी त्या घरातून निघून जाते आणि दारिद्र्य आणि गरिबी त्या घरात प्रवेश करते. तर कोणत्या या ७ गोष्टी आहेत याच आपण आज जाणून घेणार आहोत.

पहिली गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया उशिरा उठतात सूर्योदय झाल्या नंतर उठतात त्या घरात सतत दारिद्र्याची पीडा राहते. ते घर आणि त्या स्त्रीचं सासर या दोन्ही घरामध्ये दारिद्र्य निर्माण होतं.

दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया झाडूला पाय मारतात त्यामुळे सुद्धा घरात निर्माण होते. मित्रांनो झाडू हे एक लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि झाडूला कधीच लाथ नाही मारली पाहिजे.

तिसरी गोष्ट म्हणजे तवा किंवा कढई हि झोपण्यापूर्वी गॅस वरून उतरवून ठेवावी किंवा चुलीवरून उतरवून ठेवावी. बऱ्याच स्त्रिया झोपण्यापूर्वी तवा आणि कढई तशीच गॅस अथवा चुलीवर ठेवतात. यामुळे देखील माता लक्ष्मी घरातून निघून जाऊ शकते.

काही स्त्रिया तर दरवाजाला लाथ मारतात. मित्रांनो माता लक्ष्मी ज्या ठिकाणाहून येणार आहे म्हणजेच पैसे ज्या मार्गाने येणार आहे त्याच गोष्टीला जर आपण लाथ मारत असू तर माता लक्ष्मी आपल्या घरात कशी येणार…? दरवाजा हे एक शुभ चिन्ह असतं. पाहुण्याचं , अतिथूनच, देवदेवतांच स्वागत करण्याचं ठिकाण असतं. आणि म्हणून या मुख्य दरवाजाला ज्या स्त्रिया लाथा मारतात त्या ठिकाणी देखील माता लक्ष्मी येत नाही.

ज्या स्त्रिया खरकटी भांडी ठेऊन तसच झोपतात अशा घरात देखील माता लक्ष्मी वास करत नाही. माता लक्ष्मीला अस्वछता , घाणेरडेपणा अजिबात आवडत नाही.

ज्या स्त्रिया उंबरठ्यावरती बसून गप्पा गोष्टी करतात किंवा उबरठ्यावरती बसतात अशा ठिकाणी देखील माता लक्ष्मी येत नाही. तिला अशा गोष्टी पसंत नसतात.

आणि शेवटची गोष्ट म्हणजे सुर्यास्थानांतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर ज्या स्त्रिया घर, अंगण लोटतात त्या ठिकाणी देखील माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही. आपल्याला जर झाडलोट करायची आहे, स्वछता करायची आहे तर ती आपण सूर्य मावळन्या आधी करावी.

तर मित्रांनो या होत्या ७ गोष्टी किंवा चुका ज्या केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते. ती आपल्याला प्रसन्न होत नाही आणि आपल्या घरामध्ये पैसा आणि संपत्ती येत नाही. तर आम्हाला आशा आहे कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणार. माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *