उरलेले पीठ घरात ठेवत असाल तर सावधान; येऊ शकते पच्छाताप करण्याची वेळ.!

उरलेले पीठ घरात ठेवत असाल तर सावधान; येऊ शकते पच्छाताप करण्याची वेळ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या सर्वांचे जीवन धावपळीचे झाले आहे. पुर्वीच्या काळी स्त्रियांना समाजा बाहेर जास्त जावे लागत नसे त्यामुळे बाहेरची कामे सांभाळत नसत. आता जीवन सुद्धा बदललेले आहे आता पुरुषाप्रमाणे स्त्रियासुद्धा घराच्या बाहेर जाऊन खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि एकमेकांना सहाय्य करून संसार आनंदाने जगत आहेत.

आज काल स्त्री व पुरुष या दोघांनी मेहनत करून कार्य केले तरच घराचा खर्च व्यवस्थितरित्या पूर्ण होतो म्हणून सध्या स्त्रियांनासुद्धा घराबाहेर आठ ते दहा तास पडावेच लागते त्यामुळे स्त्रियांना घरामध्ये पूर्णवेळ काम करणे शक्य होत नाही आणि मग अशा वेळी घरी आल्यावर उरलेली काम अनेक स्त्रिया घाईघाईने करत असतात.

त्याचबरोबर सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचे असल्यामुळे अनेक महिला रात्रीच भाजी सगळ्या चिरून ठेवतात , मसाल्याची वाटप करतात तसेच छोट्या-मोठ्या गोष्टी सुद्धा करून ठेवतात जेणेकरून सकाळी उठल्यावर स्वयंपाक बनवायला आपल्याला त्रास होणार नाही इत पर्यंत ठीक आहे परंतु अनेक स्त्रिया रात्री कणीक सुद्धा मळून ठेवतात. हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा वाईट आहे व शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा चुकीचे मानले गेलेले आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत पिठाचे गोळे दिले जातात त्यालाच पिंड असे म्हणतात. अशावेळी कणीकचे गोल गोल आकाराचे गोळे केले जातात परंतु आपण सकाळी चपाती बनवायला जास्त वेळ लावू नये म्हणून रात्रीच डब्यामध्ये कणीकचे गोल गोल गोळे बनवून तसेच ठेवतो याचा अर्थ आपण पिंड बनवत असतो. अशावेळी रात्री भिजवलेला गोळा पिंड आसमान बनवतो त्याच्यावर प्रेत आत्मा सहवास राहतो आणि हाच गोळा आपण सकाळी उठल्यावर त्याची चपाती बनतो आणि हीच बनवलेली चपाती आपण खातो. हे अत्यंत चुकीचे आहे.

अशा प्रकारची चपाती खाल्ल्याने आपल्या घरामध्ये भांडण वाद-विवाद तंटे निर्माण होतात. अनेकांना कंबर दुखी, मान दुखी, सांधेदुखी यासारख्या विविध समस्या उद्भवू लागतात कारण की आपण ज्या चपात्या खातो त्यावर आपला हक्क नसतो तर एखाद्या प्रेत मृतात्म्याचा हक्क असतो. या प्रकारचा गोळा हा आपला नसतो तो एखाद्या मृ’त आत्म्याचा असतो अशा वेळी जर आपण त्यांच्या हक्काचे जेवण खाल्ले तर ते मृत आत्मा आपल्याला त्रास देऊ लागतात आणि अशावेळी आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या उद्भवत असतात.

अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवू नये म्हणून रात्री कधीच कणकेचे गोळे बनवून फ्रीजमध्ये ठेवू नये. सकाळी भिजवलेले पीठ आपण संध्याकाळी जेवणासाठी वापरू शकतो परंतु रात्री भिजवलेले पीठ सकाळी सूर्योदयानंतर अजिबात वापरू नये. असे करणे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे पण त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हानीकारक आहे.

जेव्हा आपण अशा प्रकारचे पीठ रात्री भिजवून ठेवतो तेव्हा सकाळपर्यंत त्यामध्ये सूक्ष्म जीवजंतूंची वाढ मोठ्या प्रमाणावर होत असते आणि अशा प्रकारचे अन्न खाल्ल्याने आपल्याला आरोग्याच्या समस्या सुद्धा होतात आणि म्हणूनच अनेकांना पोटदुखी,पोट खराब होणे, जुलाब लागणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात.

या सगळ्या शारीरिक व मानसिक समस्या दूर करण्यासाठी वाटल्यास सकाळी लवकर उठावे आणि चपाती ताज्या ताज्या बनवून आपल्या घरातील सदस्यांना खायला द्यावे परंतु रात्री चपातीचे पीठ भिजवून सकाळी ते वापरू नये. जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे कृत्य करत असाल तर आत्ताच थांबवा अन्यथा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या नकारात्मक समस्येला सामोरे जावे लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *