रोज सकाळी दिवा लावताना बोला हा 2 शब्दांचा मंत्र, न मागता मिळेल सर्वकाही..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात देवपूजा करताना दिवा लावण्याचे एक वेगळेच महत्व आहे. असे मानले जाते कि दिवा न लावता केलेले पूजन अपूर्ण असते. आपण जी काही पूजा करतो त्याचे फळ आपल्याला दिवा लावल्यावरच मिळते. त्याचे कारण असे कि आपण जी काही पूजा करतो ती पूजा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे काम दिव्यामार्फतच होते.

म्हणून देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावावा. घरात दिवा लावल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. दिवा लावताना अशा प्रकारे लावावा कि देवपूजा झाल्या नंतरही ३-४ तास तरी दिवा तेवत राहावा. पूजा झाल्यानंतर लगेचच दिवा मालवणे अशुभ मानले जाते. आणि दिवा जितक्या वेळेपर्यंत तेवत असतो तो पर्यंत आपल्याला पूजेचे फळ मिळत राहते.

त्याचबरोबर दिवा तेवत असताना घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होऊन जाते. व आपल्या जीवनातील सर्व अंधकार निघून जातो. पूर्व व उत्तर दिशेला दिवा लावणे खूप शुभ असते. तर पश्चिम वर दक्षिण दिशेला वेळप्रसंगीच दिवा लावला जातो. दक्षिण दिशा हि पितरांची व यमदेवांची दिशा असल्याने श्राद्ध पक्ष किंवा पितरांची मृत्यू तिथी इत्यादी दिवशी या दिशेला दिवा लावावा.

दिवा लावल्याने आपली फक्त पूजाच पूर्ण होत नाही तर आपल्या जीवनातील अडचणी व बाधा हि दूर होतात. शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे कि दिवा लावताना काही मंत्रांचा उच्चार केल्यास आपल्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होतात. आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहोत ज्याचा तुम्ही दिवा लावताना त्याचा उच्चार केलात तर तुम्ही जी इच्छा भगवंताकडे व्यक्त कराल ती लगेचच पूर्ण होईल. चला तर पाहूया तो खास मंत्र.

जेव्हा तुम्ही पूजन करताना दिवा लावता त्या वेळी तुम्हाला या मंत्राचा ३ वेळा जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे “शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोस्तुते” या मंत्राचा ३ वेळा जप झाल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल ती लवकरच भगवंताकडे प्रकट करावी. असे म्हटले जाते कि दिवा लावून मंत्र म्हटल्यानंतर आपण जर आपली इच्छा भगवंतांना सांगितली तर ती लगेचच भगवंतांपर्यंत पोहोचते आणि आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल, आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *