खुप पैसा मिळवायचा असेल तर सकाळी उठताच हा मंत्र 3 वेळा म्हणा; आयुष्यात धन संपत्तीची कमी भासणार नाही.!

खुप पैसा मिळवायचा असेल तर सकाळी उठताच हा मंत्र 3 वेळा म्हणा; आयुष्यात धन संपत्तीची कमी भासणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये अनेक अशा काही गोष्टी घडू लागतात त्या गोष्टीमुळे आपल्याला निराशा येऊ लागते. आपल्यापैकी प्रत्येकाला असे वाटत होते की आपल्याकडे भरपूर पैसा असायला हवा आणि आपण श्रीमंत व्हायला हवे. आपल्याकडे सुख शांती वैभव व खूप मोठ्या प्रमाणावर धन असायला हवे परंतु जेव्हा कधी आपण कोणतेही काम करायला जात असतो तेव्हा ते काम पूर्ण होता होता त्यामध्ये अडथळा येत असतात. काम नेहमी उलटे होते.

यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत जातात आणि अपयश नेहमी आपल्या मागे लागलेले असते, अशावेळी आपले मन खचून जाते.मन निराश होते आणि वेगवेगळे वाईट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येत असतात. जर तुमच्या जीवनात सुद्धा अनेक संकटे वारंवार येत असतील व या संकटापासून आपल्याला बचाव करायचा असेल तर अशावेळी हा एक मंत्र तुम्हाला उपयोगात येऊन शकेल.

हा मंत्र आपल्याला सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा आहे. महादेव भक्तांचे लाडके आहेत. भक्तांनी केलेल्या पूजेला महादेव नेहमी प्रसन्न होत असतात. आपण जरी भगवंतांची पूजा केली नाही तरी महादेवांचा एक मंत्र म्हणून आपण महादेवाला प्रसन्न करू शकतो व त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. काही मंत्र आपल्याला सकाळी आंघोळ करू म्हणायचे असतात परंतु हा मंत्र तुम्ही कधीही म्हणू शकता.

सकाळी उठल्यानंतर सुद्धा या मंत्राची जप तुम्ही करू शकतात. हा मंत्र सकाळी उठल्यानंतर तुम्हाला भगवंताचे नामस्मरण करायचे आहे.दोन्ही हातांकडे पाहायचे आहे. दोन्ही हातांची ओंजळ करायची आहे व त्यानंतर या मंत्राचा जप करायचा. हा मंत्र पुढील प्रमाणे आहे, “कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविन्दम प्रभाते कर दर्शनम्”.

या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीमध्ये दोष असेल तर तो दोष पूर्णपणे दूर होऊन जातो व त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अन्य कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर या मंत्र जपाने संपूर्ण दोष नाहीसे होऊन जातात.

आपल्या जीवनामध्ये अडचणी पूर्णपणे दूर होऊन जातात आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी वैभव येऊ लागते. आपल्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी, माता सरस्वती आणि विष्णू यांचा कृपाशिर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदू लागेल म्हणून सकाळी उठल्यानंतर या मंत्राचा तीन वेळा अवश्य करा आणि आपले जीवन सुखी बनवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *