ज्या लोकांच्या हातावर इथे तीळ असेल त्यांचे 2 लग्न होणार म्हणजे होणारच.!

ज्या लोकांच्या हातावर इथे तीळ असेल त्यांचे 2 लग्न होणार म्हणजे होणारच.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शरीरावर कुठे ना कुठे तीळ नक्की असतात. सामुद्रिक शास्त्र नुसार काही ते अत्यंत शुभ असतात तर काही तीळ मात्र अशुभ समजले जातात. आज आपण आपल्या हाताच्या बोटांवर, हातावर मनगटावर,कोपरावर, बगलेत,खांद्यावर जेथे जेथे तीळ असतात त्यांचे नक्की अर्थ काय असतात हे सामुद्रिक शास्त्र नुसार जाणून घेणार आहोत. सुरूवात करूया आपल्या हाताच्या बोटांपासून.

ज्या व्यक्तीच्या बोटावर तीळ असतो त्या व्यक्ती विश्वासास पात्र नसतात.आपण अनेकदा पाहतो की समाजात अनेक लोक आपल्याला धोका देतात. आपला विश्वास घात करतात .लक्षात घ्या जर एखाद्या व्यक्तीच्या बोटांवर तीळ असेल तर अशा व्यक्तीवर शक्यतो विश्वास ठेवू नये त्यांच्यापासून नेहमी सतर्क राहा. सावध राहा. अशा व्यक्ती बेईमान असतात. एखादे मोठं संकट आले, कठीण प्रसंग आला तर त्या संकटाची त्या सामना करता येत नाही.

आपल्यावर आलेल्या संकटाचा रडगाणं गाण्यातच त्यांना सार्थकता वाटते. आता पाहुया आपल्या हातावर जर तीळ असेल तर त्याचा काय अर्थ होतो.. ज्या व्यक्तीचा हातावर तीळ असतो त्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असतात. त्यांना त्यांच्या संपूर्ण जीवनात आरोग्याची प्राप्ती होते म्हणजेच पैसा मोठ्या प्रमाणात मिळतो. संतती म्हणजेच मुलं सुद्धा त्यांची अतिशय गुणी निघतात.

सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती अशा व्यक्तींना भरपूर प्रमाणात येते आणि हातावर तीळ असणारे व्यक्ती प्रतिभासंपन्न असतात. ज्या व्यक्तींच्या मनगटावर तीळ असतो त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.मनगटावर तीळ असणारे व्यक्ती मित्र म्हणजे कमीत कमी खर्च करणाऱ्या अनावश्यक गोष्टींवर खर्च करत नाहीत.ते बुद्धिमान असतात.त्यांच्यात विश्वसनीय असते. तुम्ही डोळे झाकून अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू शकता मात्र ज्या पुरुषांच्या मनगटावर तीळ असतो त्यांचे शक्यतो दोन विवाह होतात.

महिलांच्या बाबतीत मात्र हा अपवाद आहे.महिलांच्या मनगटावर जर तीळ असेल तर त्यांचे मात्र दोन विवाह होत नाहीत. ज्या व्यक्तींच्या कोपरावर तीळ असतात अशा व्यक्ती कशा असतात जे जाणून घेणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे.  कोपरावर तीळ असणारे व्यक्ती या शक्यतो यात्रा करण्याची इच्छा बाळगतात. यात्रा म्हणजे दूरदेशी कुठेतरी प्रवास करावा. लांबचा प्रवास करावा अशी त्यांची मनोमन इच्छा असते.अशा व्यक्ती चांगल्या स्वभावाचे असतात.महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना योग्य तो निर्णय घेता येत नाही. या व्यक्ती एक-दोन कलांमध्ये अत्यंत प्रतिभासंपन्न असतात.

कोणती ना कोणती कला त्यांच्या अंगी असलेली तुम्हाला दिसून येईल. अशा व्यक्ती धनवान श्रीमंत बनू शकतात मात्र त्यांची अडचण अशी आहे की या व्यक्तींना कोणतेही काम करताना त्यांना मन लावून करता येत नाही.त्या कामात शंभर टक्के योगदान देता येत नाही कारण त्यांचा स्वभाव चंचल असतो त्यानंतर आपण ज्या व्यक्तींच्या बगलांमध्ये तीळ असते अशा व्यक्ती कशा असतात ते म्हणजे ज्या व्यक्तीच्या उजव्या बगलांमध्ये तीळ असतो अशा व्यक्ती त्यांच्या जीवनात अनेक कष्टांचा दुःखांचा आणि कठीण प्रसंगांचा सामना करतात.

अशा व्यक्तींनी थोडसं सावधान राहावे जे काही संकटे जीवनात येणार आहेत ती संकटे येण्यापूर्वी तर त्या सावध असतील सतर्क असतील तर त्या स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबात संरक्षण करू शकतील आणि कल्याण सुद्धा त्यांचा नक्की होईल व प्रत्येक कामात सावधानता बाळगावी. जर सतर्क नसाल तर मात्र खूप मोठी दुःखद प्रसंग अशा व्यक्तींच्या जीवनात सातत्याने येत राहतात. खांद्या वर जर तीळ असेल तर अशा व्यक्ती कशा असतात तर अशा व्यक्तींची जीवनातील सुरुवातीची वर्ष हे संघर्षमय असतात मात्र नंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैसा प्राप्त होतो.

या ना त्या मार्गाने मोठ्या प्रमाणात पैसा मिळून या व्यक्ती जीवनात अत्यंत सुखी बनतात. आता आपण पाहू या भूजा भुजा म्हणजे आपल्या खांद्यापासून ते आपल्या मनगटापर्यंत जातो हाताचा भाग आहे त्यावर जर तीळ असेल तर त्याचा अर्थ काय होतो, अशा व्यक्ती अत्यंत विनम्र असतात. परिश्रमी म्हणजे कष्टाळू असतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुद्धा अत्यंत सुखी असते मात्र जर पती पत्नी यांचे जमत नसेल तर अशा पुरुषांना जीवनात अनेक युद्धांचा सामना करावा लागतो आणि कमी वयातच ते विदुर बनू शकतात म्हणजे त्यांच्या पत्नीचा मृत्यू होण्याची संभावना असते.

स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांना युद्धाचा तर सामना करावा लागणार नाही मात्र नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी त्यांना मोठ्या समस्यांचा किंवा संघर्ष करावा लागण्याची शक्यता असते आता पाहूया खाद्याच्या बाबतीत ज्या व्यक्तीच्या दोन्ही बाजूला तीळ असते अशा व्यक्ती कौटुंबिक जीवनात फारसा रस घेत नाहीत शक्यतो घराच्या बाहेर असेल त्यांचे जास्त लक्ष असते त्या व्यक्तीच्या उजव्या खांद्यावर तीळ असेल ती व्यक्ती चतुर असते. विवेकी मध्ये विवेकशील असते सोबतच नीतिवान सुद्धा असते.

ते आपल्या जोडीदाराला कधीच फसवत नाही.ती आपल्या जोडीला जीवनसाथी बरोबर नेहमी तिच्या विश्वासास पात्र ठरते. तीचे चरित्र चांगले असते आणि प्रत्येक काम विचारपूर्वक करते.अशी स्त्री नेहमी समजून प्रत्येक गोष्ट करत असते मात्र ज्या व्यक्तींच्या डाव्या खांद्यावर तीळ असतो अशा व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये आणि समाजात प्राप्त असणाऱ्या स्थितीमध्ये संतुष्ट राहात. थोडक्यात ठेविले अनंते तैसेची रहावे असा त्यांचा स्वभाव असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *