घराला उंबरा का असतो.? या उंबऱ्यामध्ये खरंच देवीचा वास असतो.? जाणून घ्या काय म्हणतंय वास्तुशास्त्र.!

घराला उंबरा का असतो.? या उंबऱ्यामध्ये खरंच देवीचा वास असतो.? जाणून घ्या काय म्हणतंय वास्तुशास्त्र.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये व वास्तुदोष शास्त्रांमध्ये अनेक अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आलेल्या आहेत,ज्या गोष्टींचा आपण पालन केले किंवा त्या गोष्टींबद्दल क सविस्तर पणे माहिती जाणून घेतल्यास आपले जीवन समृद्ध होऊ शकते तसेच आपण आपल्या मनाची शांती व अध्यात्मिक जीवन समृद्ध बनवू शकतो. या लेखामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व वेगळे असते, त्या सर्व गोष्टींचा परिणाम घरातील सदस्यांवर सकारात्मकरीत्या किंवा नकारात्मक रित्या होत असतो. आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उंबरठा. आपण जेव्हा घराची बांधणी करत असतो तेव्हा घरामध्ये प्रवेश करताना दरवाजाच्या खाली ची लाकडी पट्टी असते तिला आपण उंबरठा असे म्हणतो.

हा उंबरठा पार करूनच आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो. घर बांधणी करत असताना घराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण चार लाकडी फळी तयार करतो त्याला आपण चौकट म्हणतो परंतु हल्ली प्रत्येक जण आपापल्या आवश्यकतेनुसार व वेगवेगळ्या ट्रेंडनुसार घरे बांधतात आणि अशावेळी घराला उंबरठा बांधत नाही परंतु आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये उंबरठा बांधण्याचे अनेक सकारात्मक परिणाम व संकेत सांगण्यात आले आहेत.

अनेकदा असे म्हटले जाते की, जर आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा वास नेहमी असायला हवा, आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हसता खेळता असायला हवा करण्यासाठी घराला उंबरठा असायलाच हवा. पूर्वीच्या काळी आपल्या घरातील अनेक ज्येष्ठ मंडळी उंबरठा ची पूजा अर्चना करत असे. उंबरठा हा आपल्यासाठी अनेकदा शुभ ठरत असतो. जेव्हा आपण एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा देव दर्शनासाठी जात असतो तेव्हा उंबरठ्याचे पाय आपण सगळेजण पडत असतो कारण की उंबरठामुळे आपल्या शरीरात अनेक सकारात्मक उर्जा प्रवेश करत असतात.

उंबरठा पार केल्याशिवाय आपण देवांचे दर्शन देखील घेत नाही म्हणूनच अशा वेळी जेव्हा आपण आपल्या घराची रचना किंवा बांधणी करत असतो तेव्हा उंबरठा बांधल्यास हवा त्याचबरोबर जेव्हा बाहेरील व्यक्ती आपल्या घरामध्ये येते तेव्हा त्या व्यक्तीने उंबरठा पार करूनच आपल्या घरात यायला पाहिजे. जर आपण आपल्या घराला उंबरठा बांधला तर यामुळे अनेक सकारात्मक परिणाम मानवी जीवनावर होत असतात आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदत असते.

माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास करते व आपल्या घरातील सदस्यांना नेहमी सुख शांती, वैभव प्राप्त होऊन त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होत असतो. ज्या घराला उंबरठा नसतो अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी अडी अडचणी संकटे एकामागोमाग येत असतात. असे अनेकदा पहायला देखील मिळाले आहे. उंबरठा बांधल्यामुळे कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरातील स्त्री ने उंबरठा ची पुजा-अर्चना करायला हवी.

उंबरठा बांधलेल्या आपल्या घरातील व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन अनेक वाईट शक्तींचा नाश होतो.तुमचा शत्रू तुमच्यावर चुकीच्या कारवाया करत असतात काही वाईट परिणाम तुमच्यावर होत असेल तर त्या सगळ्यांचा प्रभाव देखील तुमच्या वर कमी होतो कारण की उंबरठा मुळे शत्रूची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. अनेक वाईट शक्ती घराच्या बाहेरच वास्तव्य करतात म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घराला उंबरठा अवश्य बांधलेला हवा.

हिंदू धर्म शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की, जेव्हा आपण एखादे काम करण्यासाठी बाहेर जात असतो तेव्हा उंबरठा आपल्याला आपण कोठे जात आहोत याबद्दल विचारणा करत असतो आणि बाहेरून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा उंबरठा अशावेळी प्रश्न विचारतो की बाहेरून काही आपण वाईट काम करून आलेले नाही ना ? याचा अर्थ आपल्या जीवनातील अनेक चांगल्या व वाईट गोष्टींचा साक्षीदार हा उंबरठा असतो आणि म्हणूनच आपल्याला उंबरठा देखील नेहमी स्वच्छ ठेवायला हवा.

आपल्या घरातील सवाष्ण स्त्रीने नेहमी उंबरठाची पूजा करायला हवी कारण की माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरुपी रहावी असे जर वाटत असेल तर घरातील मुख्य स्त्रीने उंबरठा ची नेहमी पूजा करायला पाहिजे व त्याचबरोबर उंबरठ्याच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची घाण व कचरा अजिबात ठेवू नये. ज्या ठिकाणी घाण कचरा असतो, अशा माता महालक्ष्मी थांबत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *