हे तेल कसलेही गजकर्ण, फंगल इन्फेक्शन मुळापासून संपवते; गचकर्ण साठी चमत्कारी आहे हे तेल.!

हे तेल कसलेही गजकर्ण, फंगल इन्फेक्शन मुळापासून संपवते; गचकर्ण साठी चमत्कारी आहे हे तेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या सर्वांना एक समस्या कायमची सतावत असते ही समस्या म्हणजे अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे निर्माण होणे, खरूज, खाज, नायटा, गजकरण यासारख्या विविध समस्या आपल्याला उद्भवत असतात. या समस्या प्रामुख्याने ओले कपडे घातल्यामुळे होत असतात.

बहुतेक वेळा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण आपले कपडे घालतो तेव्हा येणारी खाज व लाल चट्टे यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो परंतु कालांतराने ही खाज वाढत जाते आणि त्याचे रूपांतर गंभीर आजारांमध्ये सुद्धा होऊ लागते आणि म्हणूनच जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची खाज निर्माण झाली असेल तर वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला व घरगुती उपायांमध्ये महत्त्वाचा मानला गेलेला एक उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय साधा सोपा असला तरी तितकाच प्रभावी आहे. अंगावर खाज आली तर आपण वेगवेगळे उपचार करत असतो त्यामध्ये अनेकदा रासायनिक क्रीमसुद्धा वापरत असतो परंतु क्रीम औषधे यांचा फरक तितक्या पुरताच राहतो आणि औषध संपल्यावर पुन्हा खाज खरुज सुरू होऊन जाते.

बहुतेक वेळा खाज आपल्या शरीरावर एक ते दोन वर्षे राहते आणि म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ वापरायचा आहे तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सांगितलेला आहे, त्या पदार्थाचे नाव आहे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर आपल्याला सहज बाजारात उपलब्ध होतो.जर तुमच्याकडे भीमसेनी कापूस नसेल तर पूजेच्या वेळी आपण जो कापुर वापरतो तो सुद्धा आपण हा उपाय करण्यासाठी करणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला भीमसेन कापूर ची बारीक पावडर करून घ्यायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या दुसरा घटक पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे करंज तेल. करंज तेल हे प्रामुख्याने करंज झाडाच्या बिया पासून तयार केलेले असते. आपल्या शरीरावर कोणतेही फंगल इन्फेक्शन झाले असेल तर ते फंगल इन्फेक्शन मुळापासून नष्ट करण्याची क्षमता करंज तेलामध्ये असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा करंज तेल घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन्ही पदार्थ आपल्याला एकजीव करायचे आहे.

शरीरावर ज्या ठिकाणी खाज येते अशा ठिकाणी आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे. हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे आणि सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचा आहे. हे मिश्रण प्रभावित जागेवर लावल्याने जे सूक्ष्मजीव जंतू आहेत ते या उपायांमुळे पूर्णपणे नष्ट होतील आणि आपल्या शरीरावर फंगल इन्फेक्शन झालेले आहे ते दूर होऊ शकेल.

हा उपाय आपल्याला सातत्याने सात दिवस करायचा आहे यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्वचारोग जर असेल तर तो पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि घरच्या घरी कोणत्याही प्रकारचे त्वचारोग लवकर दूर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *