उपाशी पोटी कधीही खाऊ नका हे ५ पदार्थ; याचे दुष्परिणाम जाणून तुम्हीही वेडे व्हाल.!

उपाशी पोटी कधीही खाऊ नका हे ५ पदार्थ; याचे दुष्परिणाम जाणून तुम्हीही वेडे व्हाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बहुतेक वेळा सकाळी उठल्यानंतर कोणकोणते पदार्थ खावे असा अनेकांना प्रश्न निर्माण झालेला असतो परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण तनावाखाली जगत आहे.प्रत्येक जण स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जगामध्ये वावरत आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले आहार सुद्धा गरजेचे आहे ,अशा वेळी कोणते पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि कोणते पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक आहे याबद्दलची माहिती सुद्धा असणे गरजेचे आहे.

परंतु अनेकदा असे घडते की धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराला कोणकोणते पोषक तत्व गरजेचे आहेत याच्या बद्दल आपल्याला माहिती नसते आणि यामुळे अनेकदा आपल्याला दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत जेणेकरून सकाळी उठल्यानंतर कोणते कोणते पदार्थ आपल्याला खायला हवेत व कोणकोणते घटक पदार्थ आपल्याला खायला नाही पाहिजे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

सकाळी उठल्यानंतर फळांचे रस प्रामुख्याने घेणे टाळा. तुम्ही सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस घेऊ शकता परंतु अन्य फळांचे रस सकाळी उठल्या उठल्या पिऊ नका असे केल्याने तुमच्या शरीरामध्ये ऍसिडिटी निर्माण होऊ शकते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्ट ड्रिंक.

या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बन ऍसिड असते आणि त्याचबरोबर कार्बन-डाय-ऑक्‍साईड सुद्धा असते जर आपण सकाळी उठल्या उठल्या सॉफ्ट ड्रिंक सेवन केले तर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह आहे ते स्थिर होते आणि यामुळे अनेकदा आपल्या रक्ताभिसरण संस्थेवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक व्यक्तींना मेंदू संदर्भात समस्या असतात , ब्लडप्रेशर सारखी समस्या असतात अशा व्यक्तींनी सकाळी चुकून सुद्धा सॉफ्ट ड्रिंक पिऊ नये.

यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी कमी होते आणि याचा विपरीत परिणाम सुद्धा तुमच्या शरीरावर होऊ शकतो म्हणून सकाळी उठल्यावर सॉफ्ट ड्रिंक अजिबात पिऊ नका. सकाळी उठल्यानंतर सकाळी थंड पदार्थ अजिबात खाऊ नये. बहुतेक वेळा उठल्या नंतर लगेच थंड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराचे तापमान व त्या थंड पदार्थांचे तापमान ही यांच्यामध्ये संतुलन होत नाही आणि यामुळे शरीरामध्ये गॅसेस तयार व्हायला लागतात आणि परिणामी आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी निर्माण होऊ लागते.

त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नका. मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकदा आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी होत असते आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीराची क्षमता असते , ती कमी स्वरूपाची असते आणि यामुळे मसालेदार पदार्थ खाणे यासाठी आपले शरीर तयार नसते आणि अशा वेळी जर आपण मसाले युक्त पदार्थ व तेलकट पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये रासायनिक अभिक्रिया निर्माण होऊन गॅस निर्माण होऊ लागतो आणि परिणामी ऍसिडिटी यासारख्या समस्या आपल्याला उद्भवू लागतात.

सकाळी उपाशीपोटी कॉफी पिणे सुद्धा अत्यंत घातक मानले गेलेले आहेत कारण की कॉफी मध्ये टॅनिन नावाचे घटक असते आणि त्यांनी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत वाईट आहे. ज्या व्यक्तींना सकाळी उपाशीपोटी कॉफी पिण्याची सवय आहे, अशा व्यक्तींना अनेक समस्या उद्भवतात म्हणजेच की दात लवकर किडतात त्याचबरोबर शरीरामध्ये वारंवार निर्माण होत असते डोकेदुखी, चक्कर, उलटी ,मळमळ यासारख्या समस्या वारंवार उद्भवत असतात.

उपाशीपोटी कॉफी प्यायला आणि आपल्या शरीरातील रक्ताची पातळी सुद्धा कमी होते म्हणूनच ज्या व्यक्ती वारंवार कॉफी पितात त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता नेहमीच जाणवत असते तर तुम्हाला कॉफी पिण्याची सवय असेल तर अशावेळी तुम्ही कॉफी टाळून ग्रीन टी किंवा साधे गरम पाणी सुद्धा येऊ शकतात. हे काही महत्त्वाचे पदार्थ जर तुम्ही सकाळी उठल्याउठल्या खाण्याचे टाळले तर तुमचे आरोग्य चांगले राहू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *