14 मे अक्षय तृतीयेला कावळ्याला खाऊ ही 1 वस्तू; सर्व पितृदोष नष्ट होऊन प्रचंड पैसा मिळेल.!
![14 मे अक्षय तृतीयेला कावळ्याला खाऊ ही 1 वस्तू; सर्व पितृदोष नष्ट होऊन प्रचंड पैसा मिळेल.!](https://darjamarathi.in/wp-content/uploads/2021/05/AddText_05-13-01.27.19_compress49.jpg)
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यंदाच्या शुक्रवारी म्हणजे 14 मेला अक्षय तृतीया आलेली आहे. या दिवशी अनेक जण माता महालक्ष्मीची पूजा अर्चना करतात. धन वैभव प्राप्त करण्यासाठी माता महालक्ष्मीला अर्चना कराच पण त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांना व त्यांची आपल्यावर कृपा प्राप्त करण्यासाठी कावळ्याला ही एक वस्तू सुद्धा अर्पण करा.
आपली पितर कावळ्याच्या रूपांमध्ये येतील आणि ही एक वस्तू ग्रहण करतील त्यामुळे आपले पित्र शांत होतील तृप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय मंगल कारक होईल. आणि त्याच बरोबर पितृदोष पासून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळेल. पितृदोष म्हणजे काय की जर आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण कटकटी होत असेल तरी ही सगळी लक्षणे पितृदोषाचे असू शकतात.
अनेकदा आपल्याकडे पैसा भरपूर असतो पण घरामध्ये सुख शांती नसते. कर्जाचे डोंगर वाढू लागते.कर्ज फेडायचे नाव घेत नाही म्हणून अनेकदा मानसिक तणाव सुद्धा निर्माण होऊ लागतो. या सगळ्या गोष्टीला पितृ दोष कारणीभूत ठरतो म्हणूनच या अक्षय तृतीयेला हा एक उपाय अवश्य करा.
अक्षय तृतीयेच्या दिवशी उपाय करताना आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे , शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर स्नानविधि उरकून संपूर्ण देवपूजा झाल्यावर आपल्याला माता महालक्ष्मीची सुद्धा पूजाविधी करायची आहे आणि देवी देवतांना नैवेद्य म्हणून धीर द्यायची आहे आणि त्याचबरोबर या खीर मध्ये चपाती किंवा भाकरी कुस्करून आपल्या घराच्या पत्रांवर कावळ्यांना खाण्यासाठी खीर द्यायची आहे.
ही खीर खाऊन आपले पितर शांत होणार आहेत. जेव्हा आपले पितर शांत असतात, आनंदी असतात त्यांची कृपा आपल्यावर असते. अशावेळी आपले सगळे कार्य चांगले घडते. आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते त्यांच्या कृपाप्रसादाने आपले जीवन उत्कर्षा ने भरते. जर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल कार्यांमध्ये यश प्राप्त होत नसेल तर अशा वेळी पितृदोष निवारण करणे अत्यंत गरजेचे आहे व त्याचे काही विधिवत पूजा करणे सुद्धा महत्वाचे ठरते.
सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण बिल्डिंग मध्ये राहत असल्याने प्रत्येकाच्या छतावर जाणे व घरासमोर ठेवणे आणि शक्य होत नाही अशा वेळी जर तुम्ही जवळपास एखाद्या गोशाळेमध्ये घेत जाऊन जर गोमातेला खीर चपाती खाऊ घातले तरी चालेल. ही चपाती खाऊ घालत असताना गायीच्या पाठीवरून हात फिरवावा.
आपण सर्वांनाच माहिती आहे की, गायीच्या उदरामध्ये ते तीस कोटी देवांचे वास्तव्य असते आणि हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यादिवशी सूर्यास्ताच्या वेळी आजूबाजूला जर तुमच्या पिंपळाचे झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याला खाली म्हणजेच मुळाजवळ आपल्याला थोडीशी खेळ खीर अर्पण करायचे आहे. पिंपळाचे झाड म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरी विष्णू यांचे रूप मानले जाते आणि पित्तर सुद्धा श्रीहरी विष्णू चे स्वरूप मानले जाते.
म्हणून आपल्याला या दिवशी पिंपळाची सुद्धा पूजा करायची आहे जर तुम्हाला हे सगळं करणं शक्य होत नसेल तर या दिवशी तुम्ही एखाद्या गरिबाला व गरजू ला तुम्ही काही दान सुद्धा देऊ शकता व आपल्या घरी त्याला बोलवून खिरीचा नैवेद्य सुद्धा देऊ शकता, अशा पद्धतीने आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करून आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात म्हणून हा उपाय नक्की करा आणि आपले जीवन समृद्ध करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.