तव्यावर ही वस्तू कधीही बनवू नका; नाहीतर येते भयंकर बरबादी, व्यक्ति कंगाल होतो.!

तव्यावर ही वस्तू कधीही बनवू नका; नाहीतर येते भयंकर बरबादी, व्यक्ति कंगाल होतो.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तव्यावर चुकूनही ठेवू नका ही एक वस्तू घर अक्षरशः बरबाद होईल. गरिबी येण्याचे संकेत मिळू लागतील, मित्रांनो आपल्या किचन मधील अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे तवा. वास्तुशास्त्रानुसार तवा याचे फार मोठे महत्त्व आहे कारण या तव्यावर आपण भाकरी चपाती भाजत असतो, रोटी बनवत असतो. हे शुभ संकेतच प्रतिनिधित्व करतात आणि जर तव्याचा चुकीचा वापर करण्यात आला तर आपल्या नशिबात आपल्या भाग्यात अनेक दोष उत्पन्न होतात आणि त्या परिणामी घर हळूहळू बरबादी च्या दिशेने जाऊ लागते.चला तर मग जाणून घेऊया तवा याविषयीच्या वास्तुशास्त्रातील काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी..

वास्तु शास्त्र मध्ये तवा कधीच पालथा घालून हे सांगितले आहे असे केलेनेव आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळी घरात अन्न शिजत नाही उलट म्हणजे पालथा घातला जातो. तव्याचा वापर होत नसतो जेव्हा आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

आपल्या घरातील सर्व गोष्टी चांगल्या सुरू असताना आपण वारंवार अशा प्रकारे तवा पालथा घालत असतो तर त्यावेळी आपल्या घरात अशुभ वातावरण निर्माण होताना दिसू लागतात आणि म्हणून कधीच तवा पालथा करू नये दुसरी गोष्ट अनेक वर्षांपासून वापरात नसलेला तवा अनेकजण वापरत असतात. मित्रांनो आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर चुकीचे आहे यामुळे आपल्या शरीरात अनेक व्याधी उत्पन्न होतात. घरातील जुना जो तवा असतो त्यावर जर गंज चढला असेल तर तो गंज आपल्या पोटात जातो.

वास्तुशास्त्र नुसार घरात खूप जुना तवा वापरला जातो त्या ठिकाणी राहणारे सदस्य कधीच श्रीमंत होत नाहीत अशा घरात कधीच माता महालक्ष्मी प्रवेश करत नाही त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे की तवा कधीच उष्टा ठेवू नये. तवामध्ये खरकटे अन्न अजिबात ठेवू नये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे ज्या घरांमध्ये तवा आणि कडई नेहमी उष्टी व खरकटी रात्रभर तसेच ठेवले जाते त्या घरांमध्ये कधीच चांगले वातावरण निर्माण होत नाही तसेच त्या घरातील सदस्य नेहमी आजारी पडत असतात.

आपल्यापैकी अनेक जण तव्यावर उष्टी भांडी ठेवत असतात. तव्यावर कधीच खरकटे ठेवू नये. जर आपण आपल्या घरातील सर्वांची योग्य पद्धतीनेच काळजी घेतली तर आपल्या घरातील पैसा हा दिवसेंदिवस वाढत जातो व माता महालक्ष्मी सुद्धा आपल्यावर रागवत नाही. माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी वास्तव्य करू लागते. आपल्या समाजामध्ये मान-सन्मान व पद प्रतिष्ठा प्राप्त होते.

आपल्या घरातील गृहिणीने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा आपण तवा चुलीवर ठेवतो तेव्हा तव्यावर बनवली जाणारी पहिली चपाती किंवा भाकरी आपल्याला गाईला अवश्य द्यायला हवी आणि गोमातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे असे केल्याने आपल्यावर देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आणि अडचणी असतात त्या संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होत असते कारण गोमाते मध्ये 33 कोटी देवी देवता यांचा वास असतो.

आपल्या हातून अनेकदा कळत नकळत चुका होत असतात, अनेक पाप होत असतात या पापांचे क्षालन सुद्धा गोमातेला चपाती खायला दिल्याने होते तसेच आपल्या घरातील अनेकदा महिला तव्यावर नकळतपणे पाणी शिंपडत असतात असे केल्याने आपल्या घरातील सदस्यांमध्ये वाद-विवाद घडतात. घरातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना शिल्लक राहत नाही. प्रत्येक जण एकमेकांकडे वैरी च्या दृष्टीने पाहत असतो. एकमेकांकडे सूड घेण्याच्या भावनेने जगत असतो आणि ज्या घरामध्ये सदस्यांमध्ये प्रेम राहत नाही अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी कदापि वास्तव्य करत नाही आणि परिणामी त्या घरामध्ये नेहमी अशांती आजारपण कटकटी पिडा एकामागोमाग येऊ लागतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *