चप्पल घालून स्वयंपाक करणाऱ्यांनी हि माहिती एकदा नक्की वाचा.!

चप्पल घालून स्वयंपाक करणाऱ्यांनी हि माहिती एकदा नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज कालच्या मुली तळपाय खराब होऊ नये तळ पायाला घाण लागू नये म्हणून घरात चप्पल वापरतात. अन्नपूर्णा निवास करते जेथे आपण भगवंतांचा प्रसाद बनवतो अशा जागी चप्पल घेऊन जाणे योग्य आहे का? आजकाल तर घरातली चप्पल वेगळे वेगळ्या प्रकारचा असल्यातरी त्या शेवटी चप्पल ती चप्पल असते. ती बाहेरच शोभून दिसेल. घरात तिची जागा नाही.

आपल्या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम आपण करत असतो. आपण स्वतः जर आपल्या घराचे पावित्र्य नष्ट करू लागलो तर देवी लक्ष्मी देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होणार नाहीत का? पायातली चप्पल जर सारखी सारखी तुटत असेल आणि दरवेळेस दुरुस्त करून सुद्धा ती सारखी तुटत असेल तसेच कमरेखालील नेसली जाणारे वस्त्र पॅन्ट फाटत असते तर समजावे की शनिदेवांची वाईट कृपा दृष्टी आपल्यावर पडलेली आहे.

परंतु आजकाल तर फॅशनच्या नावाखाली मांड्यांवर फाटलेले कपडे घातले जातात असे व्यक्ती स्वतः होऊन आपल्या मागे शनिदेवाचे कोपित दृष्टी लावून घेतात. पूर्वीच्या काळी कपडे फाटले तर तेच कपडे शिऊन घातले जातात परंतु आता फाटलेले कपडेच दुकानातून खरेदी केले जातात.

ज्यावेळी घरांमध्ये चप्पल घालून प्रवेश करतात त्यावेळी घरामध्ये नकारात्मक, घरात दारिद्र्य, नकारात्मक विचार प्रवेश करतात आणि या सर्वांनी जर घरामध्ये प्रवेश केला तर घरांमधील सुख वैभव संपत्ती अन्नपूर्णा देवी माता लक्ष्मी हे घरातून बाहेर पडतात मग विचार करा आपल्याला काय हवे आहे? आपल्याला थंडी लागू नये,पायना त्रास होऊ नये यासाठी आपण घरामध्ये चप्पल वापरतो पण घरामध्ये चप्पल आले तर घरामध्ये रोग आजार पण वाढते.

आपण स्वतःहून घरामध्ये चप्पल घालून रोग दारिद्र्य कशाला आणायची त्यापेक्षा घरामध्ये गालिचाचा वापर करा कारण चप्पल ती चप्पल असते ती पायात घालावे लागते डोक्यावर घेऊन मिळवता येत नाही म्हणूनच आपल्या पायाशी चप्पल घरांमध्ये घालून फिरू नये त्याचबरोबर जर आपण स्वयंपाक घरामध्ये चप्पल घालून माता अन्नपूर्णा सुद्धा आपल्यावर रागवते आणि परिणामी आपल्या अनेक समस्यांना भविष्यात सामोरे जावे लागते.

जर तुमचे पाय अस्वच्छ होऊ नये असे जर वाटत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या युक्त्या करुन घर आपले स्वच्छ ठेवू शकता जेणेकरून तुमच्या पायाला कोणत्या प्रकारची धूळ लागणार नाही तसेच या निमित्ताने आपले घर स्वच्छ करून लादी पुसुन सुद्धा आपण आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता.या सर्व गोष्टीमुळे तुम्हांला नकारात्मक ऊर्जा पेक्षा सकारात्मक ऊर्जा जास्त मिळू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *