गरुड पुराणानुसार शिंकताना आपला चेहरा या दिशेकडे असणे मानले जाते खूपच अशुभ.!

गरुड पुराणानुसार शिंकताना आपला चेहरा या दिशेकडे असणे मानले जाते खूपच अशुभ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गरुड पुराणामध्ये एखाद्या व्यक्तीला शिंक आल्यावर अशा वेळी आपला चेहरा कोणत्या दिशेला असल्यास त्याचे शुभ-अशुभ फळ नेमके काय मिळते आणि कोणत्या दिशेला अशुभ फळ प्राप्त होते याबद्दल सांगण्यात आलेले आहे. गरुड पुराण हे अध्यात्मिक शास्त्र आहे. या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणते शुभ फळ प्राप्त होते व कोणते शुभ फळ प्राप्त होत नाही याबद्दल सुद्धा सांगत आले आहे त्याचबरोबर मनुष्याच्या मृत्युनंतर सुद्धा स्वर्ग-नरक कसे प्राप्त होईल याबद्दलचे अनेक महत्त्वाच्या सूचना या धर्मग्रंथ शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत.

मनुष्याचा मृ’त्यू झाल्यानंतर त्याला स्वर्गात किंवा नरकात याचा कशा पद्धतीने प्रवास करावा लागतो तसेच त्यांनी केलेल्या कर्मानुसार पुण्य व पाप याचे मोजमाप सुद्धा कसे पद्धतीने केले जाते याबद्दल सुद्धा या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहेत.  आज आम्ही तुम्हाला शिंका आल्यावर त्याचे आपल्याला कोणते शुभ फळ प्राप्त होतात व कोणते अशुभ फळ प्राप्त होतात याबद्दल सांगणार आहोत.

शिंका येण्याचे प्रत्येक वेळी वेगवेगळे अर्थ असतात. जेव्हा आपल्याला शिंका येतात त्यामागे काही कारणे सुद्धा असू शकतात. जेव्हा आपण एखादे कार्य करू लागतो तेव्हा शिंका येणे किंवा एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला तेव्हा शिंका येणे किंवा घरातून बाहेर पडताना शिंका येणे तसेच विवाह चालू असताना शिंका येणे याचे वेगवेगळे अर्थ व संकेत आपल्याला पाहायला मिळत आहे.

म्हणून जेव्हा कधी आपल्याला शिंका येतात तेव्हा अशा वेळी योग्य दिशेला तोंड करून शिंकायला हवे यामुळे आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होऊ शकते. चुकीच्या दिशेला शिंका करताना तोंड केल्याने आपल्याला त्याचा गंभीर परिणाम सुद्धा भोगावा लागू शकतो व त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर सिद्ध होऊ शकतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण योग्य दिशा बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया की शिंकताना आपल्याला कोणत्या दिशेला तोंड करायला हवे याबद्दल..

पहिली दिशा आहे पूर्व दिशा. पूर्व दिशेला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. पूर्व दिशेला सूर्य देव सुद्धा असतात व त्याचबरोबर पूर्व दिशेचे स्वामी इंद्रदेव आहेत जेव्हा आपल्याला शिंक येते आणि अशावेळी जर आपला चेहरा व आपले मुख पूर्व दिशेला असेल तर अशावेळी हे शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला जीवनामध्ये लाभ मिळण्याची शक्यता असते.

आकस्मित धनलाभ होण्याची शक्यता असते किंवा एखादे कार्य जर खूप दिवसापासून राखलेले आहे तर ते कार्य पूर्ण होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली आहे. पुढील दिशा आहे ती म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला यमाची दिशा मानली जाते. या दिशाची स्वामी यमदेव आहेत आणि यामदेव जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीला नेण्यासाठी स्वतः यामध्ये येत असतात.

यम देवांना धर्मराज असे सुद्धा म्हटले जाते. या दिशेला तोंड करून शिंकणे अशुभ मानले जाते याचा अर्थ असा की आपल्या जीवनामध्ये खूप मोठे संकट येणार आहे किंवा काहीतरी अडचणींना आपल्याला भविष्यात सामोरे जावे लागणार आहे असा याचा अर्थ होतो. पुढील दिशा आहे पश्चिम दिशा. पश्चिम दिशेचा स्वामी वरुण देवता आहे. वरुण देवता यांचे नियंत्रण या दिशेवर असते.

जर शिंकते वेळी तुमचा चेहरा , तुमचे मुख पश्चिम दिशेला असेल तर हे शुभ मानले जाते, यामुळे तुम्हाला मिष्टान्न म्हणजेच गोड पदार्थाचे सेवन करायला मिळणार आहे व नवीन नवीन पदार्थ सुद्धा चाखायला मिळणार आहे असा याचा अर्थ मानला जातो. पुढील दिशा आहे उत्तर दिशा. जर आपल्याला शिंक आली आणि अशावेळी जर आपला चेहरा उत्तर दिशेला असेल तर अशा वेळी हे अशुभ मानले जाते.

उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि आपल्या जीवनामध्ये धना संदर्भात काही समस्या असतील तर त्या समस्या निवारण्याचे कार्य करत असतात जर आपल्यावर कुबेर देवतांचा कृपा वर्षाव असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीच संकटे व धनाची कमतरता भासत नाही. जर तुम्हाला उत्तर दिशेला तोंड असताना शिंका आली तर यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी बरोबर तुमचे भांडण होणार आहे असा संकेत असतो.

पुढील दिशा म्हणजे अग्नेय दिशा. अग्नेय दिशाचे नेतृत्व अग्निदेव करतात. अग्निदेव हे आपल्या शरीरातील पाचक तत्व व अन्य गोष्टींवर नियंत्रण सुद्धा मिळवत असतात त्यामुळे आपले शरीर सुद्धा व्यवस्थितरित्या कार्य करत असते. अग्नेय दिशा ही पूर्व-दक्षिण यांच्यामधील मत स्थित आहे. अग्नेय दिशेला अग्निकुंड सुद्धा म्हटले जाते. अग्नी कुंडाकडे आपले मुख असेल आणि अशावेळी जर आपल्याला शिंक आल्यास ते खूपच अशुभ मानले जाते अशा वेळी आपल्याला एखादा अशुभ संदेश प्राप्त होऊ शकतो किंवा एखादा शोकसंदेश सुद्धा प्राप्त होऊ शकतो असे समजले जाते. यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये निराशा उत्पन्न होते आणि यामुळे मनुष्याचे जीवन नेहमी उदास राहते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *