या 6 लोकांना कधीच घरात येऊ देऊ नका; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

या 6 लोकांना कधीच घरात येऊ देऊ नका; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात जे लोक चांगले असतात तर काही लोक वाईट असतात, त्यांची नजर आपल्याविषयी चांगली असते तर काहींची वाईट असते. आचार्य चाणक्य हे नितीशास्त्रातील महत्त्वाचे गुरु आहेत. त्यांनी आपल्या नीतिशास्त्र ग्रंथांमध्ये अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक व्यक्ती जीवन जगत असतात.

व्यवहारी जीवन जगत असताना कोणकोणते मुद्दे आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये जपले पाहिजे याचा अप्रत्यक्ष दाखला त्यांनी या ग्रंथामध्ये दिलेला आहे त्याचबरोबर आचार्य चाणक्य यांनी असेसुद्धा म्हटले आहे की काही प्रकारच्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये न आलेल्या बरे आहे परंतु ह्या अशा प्रकारच्या व्यक्ती नेमक्या कोणत्या आहेत. हे आपल्याला माहिती नसते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशा प्रकारच्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहेत. ज्यांना आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या घरामध्ये त्यांना अजिबातच प्रवेश द्यायचा नाही चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..

आपण सगळे चांगल्या समाजामध्ये वास्तव्य करत आहोत आणि या समाजामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या घरी जात येत असतो आणि अशावेळी आपण कुणालाच आपल्या घरी येण्यापासून अडवू शकत नाही परंतु आपल्याला अशा प्रकारच्या सहा व्यक्तींना आपल्या घरात येण्यापासून आढवायचे आहे. या सहा प्रकारच्या व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आल्यातर त्यांच्या वाईट नजरेने मुळे आपल्याला भविष्यात खूप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे त्यांच्या वाईट नजरेने आपल्यावर आपल्या कुटुंबातील सदस्यांवर सुद्धा चुकीचा परिणाम होणार आहे यामुळे तुमची मनःशांती सुद्धा उडू शकेल म्हणूनच या सहा प्रकारच्या व्यक्तींना आपल्या घरामध्ये अजिबातच प्रवेश करू देऊ नका.

यातील पहिली व्यक्ती म्हणजे दुतोंडी.आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्या दुतोंडी असतात. जे आपल्या तोंडासमोर चांगले बोलतात पण आपल्या पाठीमागे आपली निंदा करत असतात अशा प्रकारच्या लोकांना आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करू देऊ नका कारण की अशा प्रकारच्या व्यक्ती आपले दुःख रडून ऐकत असतात आणि आपले दुःख इतरांना हसून सांगत असतात.

आपल्या भावनांचा बाजार करत असतात आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये अजिबात स्थान देऊ नका. अशा प्रकारच्या व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये दुरावा सुद्धा निर्माण करू शकतात. दुसऱ्या प्रकारची व्यक्ती म्हणजे चरित्रहीन व्यक्ती. जेव्हापण चरित्रहीन व्यक्तीच्या संपर्कात येत असतो तेव्हा आपल्या इकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत असतो.

चरित्रहीन व्यक्ती जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी पुढे सरसावत नसेल आणि जर आपण अशा व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न केला तरी समाज आपल्याला वाईट नजरेने बघत असतो आणि यामुळे आपल्या सुखी जीवनामध्ये चुकीचा अर्थ निघून आपल्या जीवनामध्ये संकट ओढवू शकते म्हणून चरित्रहीन व्यक्तीच्या संपर्कामध्ये जास्त प्रमाणात राहू नये. त्यानंतर पुढील व्यक्ती आहे ती म्हणजे नीच व्यक्ती. व्यक्ती म्हणजे अविद्या असलेली, मूर्ख असणारी व्यक्ती ज्यांनी आपल्या जीवनामध्ये विद्या प्राप्त केलेली नाही. ज्यांची राहणीमान समाजाला अनुसरून नाही.

समाजाने जे नियम घालून दिलेले आहे ते नियमाचे पालन सुद्धा ते करत नाही. अशा प्रकारच्या व्यक्ती सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ देऊ नये अशा प्रकारच्या व्यक्ती येण्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर अशी व्यक्ती आहे दृष्ट व्यक्ती. दुष्ट व्यक्ती ही चोरी करते, चुकीचा व्यवहार करतात. अशा प्रकारच्या व्यक्ती समाजाच्या विरोधात जाऊन चुकीचे कार्य करत असताना अशा व्यक्तीस मानवी विरुद्ध कार्य करतात म्हणून अशा प्रकारच्या व्यक्ती सुद्धा आपल्या घरामध्ये यांना प्रवेश देऊ नका.

कारण की दृष्ट व्यक्तींच्या सह्या संगतीत जर तुम्ही सुद्धा राहाल जर तुम्हाला सुद्धा त्यांच्या संगतीमुळे दृष्ट व्हावे लागेल आणि तुमच्या जीवनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे त्रास देणाऱ्या व्यक्ती. आपल्या आजुबाजूला अशा अनेक व्यक्ती वावरत असतात ज्यांना आपल्याला त्रास देण्यात आनंद असतो. जर तुमच्या सुद्धा आजूबाजूला त्रास देणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये अजिबात थारा देऊ नका कारण की अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्याला नेहमी काही ना काही व कोणत्या ना कोणत्या गोष्टीने त्रास देत असतात.

आपल्या जीवनामध्ये संकटं कशी ओढवतील याचा प्रयत्न करत असतात. आपल्या घरामध्ये प्रवेश करून त्यानंतर ची सर्वात शेवटची व्यक्ती म्हणजे आपल्या व्यंगावर बोट ठेवणारी व्यक्ती. काही व्यक्ती आपल्या व्यंगावर नेहमी बोट ठेवत असतात. आपल्या जिवनातील वाईट गोष्टी नेहमी आपल्याला आठवण करून देत असतात परंतु जर तुमच्या जीवनात सुद्धा अशा प्रकारच्या काही व्यक्ती वावरत असतील तर त्यांना अजिबात स्थान देऊ नका.

या व्यक्ती आपल्या जीवनातील चुकीच्या गोष्टींना नेहमी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आपले जीवन उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकते म्हणून चाणक्य गुरु असे म्हणतात की अशा सहा प्रकारच्या व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये कधीच प्रवेश देऊ नका अन्यथा तुमच्या जीवनाचे नुकसान होऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *