एकदा वापरलेला नारळ देवाला डबल वाहिल्याने काय घडते..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मात देवांच्या पूजनात नारळाला फार महत्व आहे. नारळाला श्रीफळहि म्हटले जाते. कोणतेही धार्मिक कार्य नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तसेच कोणत्याही शुभकार्यातही सर्वप्रथम नारळ लागतोच. सत्कार समारंभातही नारळ व शाल देऊन मान दिला जातो. लग्न कार्यातही एकमेकांना नारळ दिले जातात.
नवस करायचा असेल किंवा आपले गार्हाणे भगवंतांपुढे मांडायचे असेल तर नारळ व पानसुपारीचा विडा भगवंतांपुढे मांडून आपण आपले गार्हाणे परंब्रह्मांपुढें मांडतो. आपला एखादा प्रश्न असो किंवा अडलेली कामे ती सर्व मार्गी लागावीत यासाठी आपण नारळाचा हा उपाय करतो. परंतु हा उपाय केल्यानंतर मंदिरात जे नारळ अर्पण केले जाते त्या नारळावर नवस बोललेला असतो व विनंती केलेली असते. म्हणून ते नारळ पाण्यात अर्पण करावेत असा नियम आहे. 

कारण त्यावर इतरांची इच्छा व विनंती असते. म्हणून त्या नारळाचा वापर इतर कोणत्याही कारणास वापर करणे योग्य नाही. एखादी वस्तू मंदिरात असेल ती योग्यच असेल असे नाही. म्हणून आपण कोणत्याही धार्मिक कार्यासाठी आपल्याला नारळ लागत असेल किंवा इतर कोणती वस्तू लागत असेल तर योग्य खात्रीणीशी योग्य ती वस्तू किंवा नारळ बाजारातून विकत आणून मगच भगवंतांना अर्पण करावी. 
एकदा अर्पण केलेल्या श्रीफळात म्हणजेच नारळात दोष येतात. म्हणून असे दोषयुक्त नारळ कोणत्याही धार्मिक किंवा शुभकार्यासाठी न वापरता ते पाण्यात विसर्जित करणेच योग्य आहे. म्हणून कधीही मंदिरात किंवा धार्मिक कार्यासाठी बाहेरून दुकानातून नवीनच नारळ विकत आणावेत. मंदिरातून अर्पण केलेले नारळ वापरू नयेत.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला जरूर विसरू नका. 

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *