हे औषध घरीच बनवून लावा; नायटा, गजकर्ण कायमचा जाईल, जरासुद्धा डाग राहणार नाही.!

हे औषध घरीच बनवून लावा; नायटा, गजकर्ण कायमचा जाईल, जरासुद्धा डाग राहणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खाज ,खरूज ,नायटा गजकरण कायमचे दूर करण्‍यासाठी करा हा एक घरगुती उपाय. अनेकदा आपण दिवसभरातून दोनदा किंवा त्यापेक्षा जास्त आंघोळ करतो तरीसुद्धा आपल्या अंगावर खाज, खरूज, नायटा व लालसर चट्टे निर्माण होतात. यालाच नायटा देखील म्हटले जाते. बहुतेक वेळा आंघोळीची जागा लहान असल्याने व मनसोक्त आंघोळ आपल्याला करायला मिळत नसल्याने बहुतेक वेळा कमरेखालचा भाग आपण जास्त प्रमाणामुळे स्वच्छ करत नाही आणि म्हणूनच बहुतेक वेळा अंगावर घाम निर्माण होऊन आपल्या शरीराला खाज सुटू लागते.

म्हणून शरीरावर निर्माण झालेले फंगल इन्फेक्शन वेगाने वाढू लागते, परिणामी आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकार होऊ लागतात. जर आपल्याला त्वचा विकारापासून सुटका मिळवायची असेल तर आपल्या शरीराची योग्य प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतल्यास कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन आपल्याला होणार नाही म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहे. हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार लवकरच दुर होणार आहे चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..

खाज, खरुज, नायटा, गजकर्ण दूर करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोरफड लागणार आहे. कोरफडीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप गुणधर्म सांगण्यात आलेले आहे तसेच कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. कोरफड सगळ्यांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असते आणि अनेक ठिकाणी याची लागवड सुद्धा केली जाते.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी कोरफडचा गर लागणार आहे. आपल्या त्वचेवरील बुरशी चा नाश करण्यासाठी कोरफडीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे तुळशीचे पाने. तुळशीची पाने सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये अंगणामध्ये तूळस उपलब्ध असते आणि म्हणूनच परिणामी तुळशीची पाने आपल्याला सहज उपलब्ध होतात.

ज्या व्यक्तीं ना खाज खरुज वर आग जास्त प्रमाणामध्ये होते अशा व्यक्तीने जर तुळशीच्या पानांचा रस प्रभावी जागेवर लावल्यास खाज येणे बंद होऊन जाते. आता आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे भीमसेनी कापूर.त्वचा संदर्भातील मोठ मोठे समस्या व आजार दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर याचे महत्त्व आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेले आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्या दोन ते तीन तुकडे म्हणजेच तीन ते चार ग्राम भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता आपल्याला वरील सर्व पदार्थांची बारीक पेस्ट बनवायची आहे. आपण जी पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे. हा उपाय करण्यासाठी दोन ते तीन तीन तीन लिंबूचा रस टाकायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे.

आपल्या शरीरावरील खाज, खरुज,नायटा दूर करण्यासाठी आपल्या शरीराची अंतर्गत स्वच्छता सुद्धा करणे तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक वेळा आपल्या शरीराचे कमरेखालील भाग आपण चांगल्या पद्धतीने स्वच्छ करत नाही आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर बुरशी निर्माण होते आणि परिणामी वेगळ्या प्रकारचे त्वचा विकार उद्भवू लागतात.

जर दररोज रात्री तुम्ही त्रिफळा चूर्ण गरम पाण्यामध्ये टाकून सेवन केले तर तुमच्या शरीरामधील जे काही विषारी घटक आहे ते सुद्धा बाहेर पडण्यासाठी मदत होतील. आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती प्रभावी जागेवर लावण्याआधी सर्वप्रथम ज्या ठिकाणी खाज जास्त प्रमाणात होते असा भाग स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचा आहे आणि त्यानंतर कापूसाच्या साहाय्याने आपल्याला ही पेस्ट लावायची आहे.

पेस्ट लावल्यानंतर अर्धा ते एक तास आपल्याला प्रभावी जागेवर तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने ही पेस्ट धुवून काढायची आहे असे जर आपण आठवड्यातून दोन वेळा जरी केले तर आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार असेल तो मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होईल म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *