शनिवारी पिंपळाला अर्पण करा हि 1 वस्तू; हनुमान करतील सर्व दुःख दूर.!

शनिवारी पिंपळाला अर्पण करा हि 1 वस्तू; हनुमान करतील सर्व दुःख दूर.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारतात अनेक लोक रोज पूजा अर्चना करत असतात. आपल्या जीवनातील दुःख संकटे कष्ट दूर करण्यासाठी अनेक व्रत उपासना करत असतात तसेच आणि त्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेत असतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख-शांती-समाधान येऊ शकेल म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असाच उपाय सांगणार आहोत, तो उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील संकटं दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती वैभव येईल.चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दलचा उपाय..

आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पिंपळाच्या झाडाकडे पाहिले गेल्यास तर हे झाड मानवासाठी वरदान सिद्ध झालेले आहे कारण इतर झाडे दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन-डाय-ऑक्‍साईड सोडणारे पिंपळाचे झाड आहे. हे रात्री आणि दिवसा दोन्ही वेळ ऑक्सिजन सोडत असते म्हणून वैज्ञानिक दृष्ट्या ह्या झाडाचे अनन्य महत्त्व आहे.

धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले गेले तर भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की, सर्व वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे. या झाडाच्या सावलीमध्ये उभे राहिल्यास आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते कुंडली मधील असलेले दोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाचे पूजन खूपच लाभदायक असते.

पद्मपुराणाचा नुसार पिंपळाचे झाड हे श्रीविष्णूचा अवतार असल्यामुळे या झाडाची पूजा केल्याने आपल्याला हवे असलेले इच्छित फळ मिळते. पिंपळाच्या झाडा मध्ये श्रीविष्णूचा वास तर असतोच पण पौर्णिमेच्या दिवशी माता महालक्ष्मी चा सुद्धा वास असतो. पद्म पुराणानुसार पिंपळाचे पूजन व प्रदक्षणा केल्यास आपले आयुष्य वाढते.

जे व्यक्ती पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात अशा व्यक्तींना सर्व पापातून मुक्तता मिळते आणि त्यांना स्वर्गाची दारे खुली होतात. पिंपळा मध्ये पितरांचे वास्तव्य असते असे सुद्धा मानले मानले जाते त्याचबरोबर सर्वतीर्थ असल्याचे सुद्धा मानले असल्याचे सुद्धा मानले जाते. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडा मध्ये श्रीशनिदेवाची सुद्धा वास्तव्य असते असे मानले जाते.

शनी साडेसाती व शनी प्रकोप पासून वाचण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास आपल्याला शनिदेवाच्या प्रकोपापासून संरक्षण लागते आणि श्री शनि देव आपल्यावर कृपा वर्षा करतात. पिंपळाच्या झाडावर माता महालक्ष्मी ची बहीण अलक्ष्मी हीसुद्धा वास करत असते. म्हणून या झाडाचे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पर्यंतच पूजन करावे त्यानंतर पूजन करू नये.

रात्री या झाडाचे पूजन केल्यास आपल्याला दारिद्र्य व गरिबी येते. श्रीविष्णू या झाडाला असा आशीर्वाद दिला आहे ज्या व्यक्ती शनिवारी या झाडाची पूजा करतील त्या व्यक्तीला शनि दोषापासून मुक्तता मिळेल. त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होईल.शनिदेवाच्या कोपा मुळेच मुळेच घरातील वैभव संपत्ती नष्ट होते परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे त्या व्यक्तीवर श्रीशनिदेवाची व माता महालक्ष्मीची कृपा सदैव राहते तसे तर रविवार टाळून बाकीचे इतर दिवस पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ असते.

परंतु अमावस्या व पौर्णिमा या दिवशी केलेले पूजन खूपच लाभदायक ठरते तर तुम्हाला श्री शनिदेवाच्या प्रकोपापासून संरक्षण मिळवायचे असेल तर दर शनिवारी एक मातीचा किंवा पितळेचा दिवा घ्यावा त्यात राईचे तेल टाकून कापसाची वात न टाकता काळ्या दोऱ्याची वात टाकावी आणि किंवा एक रुपयाचे नाणे टाकावे व हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा.

दिवा लावताना दिव्याची ज्योत पश्चिम दिशेला येईल अशापद्धतीने दिवा पेटवायचा आहे कारण पश्चिम दिशेचे स्वामी श्री शनिदेव आहेत,असे केल्याने आपल्यावर शनि देवाची कृपा होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे कष्ट दूर होतात. जर तुम्ही पितृदोष याने पीडित असाल असाल किंवा जर तुमच्या पितरांना तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर अशावेळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे.

असे केल्याने आपल्या पितरांचा शुभाशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो त्याच बरोबर भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांचे कृपा सुद्धा आपल्यावर सदैव राहते. तुम्हाला काळ सर्पदोष यापासून मुक्तता मिळवायची असेल किंवा सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी एक मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये राईचे तेल टाकायचे आहे तसेच दिव्यामध्ये गोल वात बनवून त्यात थोडसे काळे तीळ मिसळायचे आहे आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे.

या दिव्याची वात कोणत्याही दिशेला नसावी सरळ मधोमध वरच्या दिशेला जाणारी असावी. दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाचे स्मरण करायचे आहे नंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना भगवान विष्णू यांना वंदन करावे. भगवान हनुमान यांना वंदन करावे त्यानंतर सर्व देवी देवतांना वंदन करून भगवान श्री शनिदेव यांना वंदन करून मग हनुमान चालीसा याचे पठण करावे व भगवान विष्णू यांचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे.

सर्व शनी दोषापासून मुक्तता मिळवायची असेल तर ओम शं श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. जर पितृदोष यापासून मुक्तता मिळवायची असेल तर ओम पितृ भ्यो नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. धर्मशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली राईचा दिवा लावून जर हनुमान चालीसा चे वाचन केल्यास सर्व संकट दुःख पीडा दूर होते अशी मान्यता आहे त्याचबरोबर शनि दोषापासून मुक्तता मिळते.

स्वतः शनि देव देव यांनी असे सांगितले आहे की ,जे भक्त हनुमान जी यांची पूजा करतात त्यांच्यावर कधीच शनी दोषाचा प्रभाव होणार नाही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदेल तसेच पिंपळाची पूजा केल्याने शत्रू दोषांपासून लाभ मिळतो. रविवार सोडून अन्य दिवस पिंपळाची पूजा करू शकता पण ही पूजा करत असताना पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये लांबूनच या झाडाची नेहमी पूजा करावी.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *