सिंह राशीच्या माणसांचा स्वभाव कसा असतो नक्की पहा.

सिंह राशीच्या माणसांचा स्वभाव कसा असतो नक्की पहा.

नमस्कार मित्रांनो,

आपण आता सिंह राशीचे माणसं कशी असतात? त्यांचा स्वभाव कसा असतो? आणि त्यांना कोणत्या गोष्टीची आवड असते हे पाहणार आहोत. मित्रांनो सिंह राशीचे लोक कसे असतात? सिंह राशीचे लोक अत्यंत कडक स्वभावाचे असतात. कारण सिंह राशीचा स्वामी रवी असल्यामुळे या राशीचे लोक अ त्यं त तेजस्वी, ओजस्वी आणि प्रतिभावंत असतात.

यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ असते की, कोणत्याही कार्यसिद्धीसाठी सिंह व्यक्ती यशाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला दिसते. लोकांकडून हे लवकर प्रभावित होतात आणि कसलाही मागचा पुढचा विचार न करता आपले सर्वस्व त्यांना कुर्बान करतात. सिंह राशीचे पुरुष अ त्यं त स्वाभिमानी, प्रतिष्ठित, स्वावलंबी, पराक्रमी आणि मीडर असतात.

आपले कर्तव्य, शौर्य व दृढनिश्चयाने ते बहुदा नेतेपदी सुद्धा विराजमान असतात. सिंह राशीचे पुरुष एकांतप्रिय स्वभावाचे असतात. याचा मूड अतिशय लवकर बिघडतो. यांच्या हो ला हो म्हणणारे आणि यांच्या पुढे पुढे करणारे लोक त्यांना फार आवडतात. यामुळे समाजात हे वेगळे पडतात. आपला खोटा मोठेपणा आणि प्रभुत्वामुळे यांचे सगेसोयरे सुद्धा यांच्यापासून दूर जाऊ शकतात.

याचमुळे त्यांचे वैवाहिक जीवनही सुखी असताना शक्यतो दिसत नाही. लहान सहान कारणांवरून पत्नीशी नेहमी वितंडवाद करताना सिंह राशीचे लोक आढळतात. याचा परिणाम त्यांच्या मुलावर देखील होण्याची शक्यता असते. आपल्या कर्मठ आणि तर्कट स्वभावामुळे कोणापुढेही नवत नाहीत. मोठी जोखीम उचलण्यास हे नेहमी तयार असतात. आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहर्ष बलिदानाची तयारी असते.

खूप परिश्रम आणि सतत प्रयत्नशील राहून आपले ध्येय गाठीशी पूर्ण क्षमता या सिंह राशीच्या लोकांमध्ये सामावलेली असते. सिंह राशीच्या लोकांना जो कोणी व्यक्ती आणि शांत स्वभावाने बोलेल किंवा गोड बोलेल अशा लोकांनाच हे सिंह राशीचे लोक वश होतात. सिंह राशीच्या लोकांना सर्दी आणि वाताचा रोग होण्याची शक्यता असते. पण मित्रांनो सिंह राशीचे लोक अतिशय भाग्यशाली असतात.

संतती अतिशय विद्वान यांच्या पोटी जन्माला येते. पण सिंह राशीचे लोक नेहमी आजारी असल्याची शक्यता असते. सिंह राशीच्या लोकांनी पाण्याच्या तिरी, तीर्थक्षेत्री अथवा देवळात गेल्यानंतर त्या ठिकाणी सावधानीने दर्शन घेऊन किंवा पाण्याच्या ठिकाणावरून लवकर बाजूला व्हावे. त्या ठिकाणावर पाण्याच्या ठिकाणावरती सिंह राशीच्या लोकांना भीती जरा जास्त असते.

वयाच्या पाचव्या वर्षी, विसाव्या वर्षी आणि तिसाव्या वर्षी या राशीच्या लोकांना गंडांतर येण्याची शक्यता असते. आणि या जर गंडांतरातून हे माणसं वाचले तर वयाच्या 78 वर्षापर्यंत हे जगू शकतात. या राशीच्या लोकांनी ज्येष्ठ महिन्यांमध्ये कुठलेही महत्वाचं काम करायचं नसतं. या ज्येष्ठ महिन्यामध्ये सतत चिडचिड होणे, काम न होणे, कोणी जर बोल तर त्याचा राग येणे या अतिशय गोष्टी होऊ शकतात.

आणि या राशीच्या लोकांना घरात मास हा ज्येष्ठ मासच सांगितलेला आहे. या राशीच्या लोकांनी तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी या तिथीवरती कुठलेही महत्त्वाचं काम करायचं नाही. त्याच पद्धतीने मूळ नक्षत्राच्या दिवशी या मूळ नक्षत्रावरती या लोकांनी अतिशय सावधान असावं. तर ही सिंह राशीच्या लोकांविषयी माहिती होती.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *