शरीरातील उष्णता चुटकीत बाहेर फेका, सतत घाम येणे, तोंड येणे, पोटात जळजळ, हातपायाची आग होणे, अपचन गायब

शरीरातील उष्णता चुटकीत बाहेर फेका, सतत घाम येणे, तोंड येणे, पोटात जळजळ, हातपायाची आग होणे, अपचन गायब

नमस्कार मित्रांनो,

कुठल्याही वेळेला फक्त 3 दिवस हे पाणी घ्या. उष्णतेचा तुम्हाला कुठलाही त्रास असेल, उष्णतेमुळे डोळ्याची जळजळ होत असेल, हाता पायाची आग होत असेल, उष्णतेमुळे प्रचंड घाम येत असेल उष्णतेमुळे तोंडामध्ये फोड येत असतील किंवा छातीमध्ये जळजळ होत असेल, पोटामध्ये गडबड किंवा जळजळ करत असेल,

खूप घाम येत असेल आणि त्यामुळे अंगाला पुरळ येत असेल, फोड येत असतील, उष्णतेमुळे डोकं दुखत असेल, अपचन होत असेल किंवा थकवा, चक्कर येत असेल तर मेसेज पडत असतील अशा प्रकारचा उष्णतेचे कुठलाही त्रास तुम्हाला असेल तर तो फक्त 3 दिवसांमध्ये पूर्णपणे निघून जाईल आणि अगदी घरच्या घरी करता येणार हा उपाय आहे.

तुम्ही करून बघा अगदी दोन-तीन दिवसांमध्ये तुमचा उष्णतेचा त्रास आहे तो किती दिवसाचा जरी असला तरी तो पूर्णपणे निघून जाईल. जेवताना प्रचंड घाम येण्याची सुद्धा समस्या असते बऱ्याच जणांना, तो जो त्रास आहे तो सुद्धा या उपायाने पूर्णपणे निघून जाईल. आणि उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन तीन गोष्टी लागतात जे आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. यासाठी जी पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ते आहे धने.

धने आपल्याला घ्यायचे आहे. हा उपाय सांगितलेल्या पद्धतीनेच करायचा आहे आणि त्यामुळेच आपल्याला चांगल्यारीतीने त्याचा फायदा मिळणार आहे. रात्री आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायच आहे. त्यामध्ये पहिला जो घटक आपल्या टाकायचा आहे ते आहेत धने. धने हे शीत प्रवृत्तीचे असतात. त्याचबरोबर याने छातीतला कफ मोकळा होतो.

ज्वरनाशक असतात, हे शामक आणि उष्णतेचा त्रास घालवणारे व्हिटॅमिन बी गटामधली जीवनसत्व याच्यामध्ये असतात. मग त्याच्यामध्ये क जीवनसत्व सुद्धा आहेत. व्हिटॅमिन ब1 आहे, ब2 आहे. क जीवनसत्त्व आहे, अनेक प्रकारचे पोषणतत्व याच्यामध्ये असतात आणि त्यामुळे उष्णतेचा जो त्रास आहे तो कमी होतो. एक चमचा धने त्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. दुसरा घटक आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे ते आहे जिरे.

जिरे आपण भाजीसाठी वापरतो ती आपल्याला याच्यामध्ये भिजायला टाकायचे आहे. जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात थायमल असत. ते एक जंतनाशक आहे आणि जंतुनाशक उत्साहवर्धक सुद्धा आहे, वायुनाशक आहे आणि त्याचबरोबर जिरे हे प्रकृतीने थंड असतात. आणि त्यामुळे उष्णतेचा जो त्रास आहे तो घालवतात. जिरेसुद्धा 1 चमचाभर आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे आणि रात्रभर हे भिजू द्यायचं आहे.

सकाळी उठल्याबरोबर किंवा तुम्हाला ज्या वेळेला शक्य असेल, त्या वेळेला, जेवणानंतर, जेवणाच्या आधी, कोणत्या वेळेला तुम्ही करू शकता. हे जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये तिसरा जो घटक आपल्याला मिक्स करायचा आहे, ज्यांना शुगर वैगेरे नाही अशा व्यक्तींना त्यामध्ये जी मोठी खडीसाखर असते ती एक चमचाभर खडीसाखर मिक्स करायचे आहे. ज्यांना शुगरचा त्रास आहे, साखर आहे अशांनी हे साखर नाही टाकला तरी चालेल, बाकीच्यांनी वापरायचे आहे.

एक चमचाभर खडीसाखर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. चांगल्यारीतीने हलवून घ्यायच आहे. गाळून घ्यायचे आहे आणि प्यायचं आहे. हे 3 दिवस तुम्ही हा उपाय करून बघा तुमचं शरीर एकदम तुम्हाला थंड जाणवेल. उष्णतेचा सर्व त्रास पूर्णपणे निघून जाईल. त्यामध्ये मग हातापायाची आग असेल, कुठलाही त्रास असेल उष्णतेचा तो पूर्णपणे निघून जाईल.

शिवाय अन्न सुद्धा चांगल्या पद्धतीने पचायला लागेल. गॅसेसचा त्रास निघून जाईल, ऍसिडिटी तुमची निघून जाईल आणि वारंवार तोंड येण्याची समस्या आहे ती सुद्धा तुमची निघून जाईल. अनेक अपचनाचे त्रास सुद्धा तुमचे निघून जातील. अ त्यं त महत्त्वाचा हा उपाय आहे.

हे घटक जरी साधे असले तरी याचा जो परिणाम आहे तो इतका जबरदस्त आहे तुम्ही करून बघा. उष्णतेचा जो त्रास आहे तुमचा 3 दिवसांमध्ये पूर्णपणे निघून जाईल. तर हा साधा सोपा सहज करता येणारा उपाय तुम्ही अ व श्य करा. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *