तोंड येणे या आजारासाठी रामबाण औषध आहे हे एक पान; १ दिवसातच मिळेल आराम.!

तोंड येणे या आजारासाठी रामबाण औषध आहे हे एक पान; १ दिवसातच मिळेल आराम.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वारंवार तोंड येत असेल तर करा हा घरगुती उपाय. अति जागरण ,मानसिक ताण तणाव तसेच विटामिन ब१२ची कमतरता यामुळे अनेकदा तोंडात छाले पडत असतात, तोंड येत असते तसेच तोंडाला व आतील भागाला फोड सुद्धा येत असतात. अशा प्रकारची समस्या बहुतेक वेळा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे निर्माण होत राहते असेच नाही तर अनेकदा एखादी औषधांचे साईड इफेक्ट, जागरण, चहा-कॉफीचे अतिप्रमाणात सेवन करणे, जास्त गरम पदार्थ खाणे ,अति तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अनेक विषारी घटक तयार होत असतात.

या कारणामुळे सुद्धा तोंड येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अनेकदा कुपोषणामुळे किंवा जेवताना जीभ चावली गेल्यामुळे सुद्धा फोड निर्माण होऊन तोंड येण्याची समस्या निर्माण होते. जरी तोंड येण्याची समस्या साधी वाटत असली तरी जेवण करताना या समस्येचा होणारा त्रास हा भयंकर असतो. पण आजच्या लेखामध्ये आम्ही सांगणारा जो घरगुती उपाय आहे,या उपायामुळे तुमची तोंड येण्याची समस्या मुळापासून नष्ट होणार आहे . चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

तोंड येण्याच्या समस्येवर गुणकारी उपाय म्हणून हा अतिशय आजचा उपाय महत्त्वाचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाचे घटक लागणार आहे त्यातील पहिला घटक म्हणजे पेरूची ताजी पाने. पेरूची पाने आपल्या घराशेजारी सहज उपलब्ध होत असतात त्याचबरोबर जेव्हा आपण बाजारामध्ये पेरू विकत घेण्या साठी जातो तेव्हा त्या फेरीवाल्या कडे सुद्धा पेरूची पाने आपल्याला अनेकदा उपलब्ध होतात.

पेरूच्या पानामध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी इन फ्ला मेंटरी गुणधर्म आढळतात. यामुळे तोंडातील इन्फेक्शन कमी करण्याकरता निश्चित मदत होते त्याचबरोबर पेरूचे कोवळी पाने खाल्ल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता सुध्दा कमालीची वाढते.त्या शिवाय सर्दी,पडसे,खोकला यासारखे वायरल इन्फेक्शन सुद्धा एका दिवसात दूर होते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पेरूचे कोवळे मध्यम आकाराचे पान घ्यायचे आहे यानंतर चा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कात. विड्याच्या पाण्यामध्ये वापरला जाणारा कात हा आपल्या उपायासाठी आपल्याला घ्यायचा आहे. कात खाल्ल्याने जिभेवरील डाळीमध्ये अस्कॉर्बिक ऍ सिड नियंत्रणात राहते ,जेणेकरून तोंडामध्ये आलेल्या जखमा , फोड भरून निघण्यास मदत होते. आपण आपल्या उपायासाठी काताचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि या पानाचा विडा बनवायचा आहे.

हा तयार झाला आपला सरळ आणि साधा सोपा उपाय. सकाळी व संध्याकाळी जेवणाच्या अर्धा तास आधी हा उपाय आपल्याला करायचा आहे. या दरम्यान तयार होणारी जी लाळ आहे तुम्ही गिळू सुद्धा शकतात. दोन-तीन दिवस सातत्याने हा उपाय केल्यास तुमचे तोंड येण्याची समस्या लवकरच दूर होते.

या दरम्यान पोट साफ राहील अशा पद्धतीचा आहार करणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर अति जागरण, मसालेदार, तिखट पदार्थ ,चहा ,कॉफी यांचे अति प्रमाणामध्ये सेवन करणे सुद्धा आपल्याला टाळले पाहिजे. जर या सगळ्या गोष्टीवर तुम्ही नियंत्रण केल्यास आणि लेखांमध्ये सांगितलेला उपाय जर केला तर तोंड येण्याची समस्या लवकरच तुमची नष्ट होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *