आंब्याची कोय व सालीचा असा भन्नाट वापर पाहून तुम्हीसुद्धा दंग व्हाल; पहा त्याचे चमत्कारी फायदे.!

आंब्याची कोय व सालीचा असा भन्नाट वापर पाहून तुम्हीसुद्धा दंग व्हाल; पहा त्याचे चमत्कारी फायदे.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आंबा हा फळांचा राजा आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आंब्याची वाट पाहत असतो आणि मोठ्या आवडीने आंबा खात असतो. आंबा खातांना आपण त्याची साल व कोय बाहेर फेकून देतो परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत,ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही भविष्यात कधीच आंब्याची साल आणि कोय फेकणार नाही. चांगला पिकलेला आंबा खाल्ल्याने आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे दूर होतात. आपल्या शरीरातील उष्णता कमी होते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा ,स्पर्म वाढविण्यासाठी सुद्धा मदत होत असते.

सर्वात प्रथम आपण आंब्याच्या सालीबद्दल चे उपयोग जाणून घेणार आहोत. आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन बी सिक्स असतात आणि विटामिन सी हे आपली त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. आंब्याच्या सालीमध्ये असे काही औषधी गुणधर्म तसेच एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेला उपयुक्त ठरतात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग झालेला असेल तर तो त्वचारोग दूर करण्यासाठी आंब्याची साल मदत करते.

आंब्याच्या सालीमध्ये विटामिन बी सिक्स , विटामिन सी व्हिटॅमिन असल्यामुळे आपल्या त्वचेवरील जे काही काळे डाग असतात ते काळे डाग निघण्यासाठी मदत होत असते आणि यामुळे आपली त्वचा उजळते.हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याच्या सालीची पेस्ट बनवायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपण आंब्याची साल सुकवून त्याची पावडर सुद्धा बनू शकतो आणि चेहऱ्याला व त्वचेला लावू शकतो, असे केल्याने आपल्या चेहऱ्यावर काळे डाग असतील, सुरकुत्या असतील ते निघून जाण्यास मदत होते.

त्यानंतर आता आपण आंब्याच्या कोय बद्दल जाणून घेऊया. आंबाची कोय ही आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची कोय सुकवून द्यायची आहे आत मध्ये जो पांढरा गर असतो तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे.

या पांढर्‍या गरामध्ये विटामिन बी सिक्स उपलब्ध असते ,जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते आणि परिणामी आपल्याला हार्ट अटॅक सुद्धा येत नाही. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना मुळव्याध आहे अशा व्यक्तींनी विटामिन बी सिक्स सेवन केले तर त्यांचा मुळव्याध पूर्णपणे बरा होऊन जातो.

या पांढऱ्या पदार्थांमध्ये लायसन नावाचे एक गुणधर्म असते जे आपल्या शरीरामध्ये विटामिन सी सोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य करत असते आणि यामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण सुद्धा होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची कोय सुरुवातीला सूकवायची आहे आणि त्यानंतर यातील जो पांढरा गर आहे तो बारीक वाटूण घ्यायचा आहे त्याची पावडर तयार करायची आहे.

ही पावडर आपल्याला सकाळी उठल्यावर उपाशी पोटी एक चमचा खायचे आहे असे केल्याने आपल्या शरीरातील व रक्तातील साखर वाढलेली आहे ते साखर नियंत्रणामध्ये राहते त्याचबरोबर मुळव्याध सुद्धा नियंत्रणात राहतो.अनेकांना केसांच्या समस्या असतात, केस वारंवार तूटत असतात, केस गळत असतात यामुळे केसांना अनेकदा टक्कल सुद्धा पडत असते,अशावेळी सुद्धा ही पावडर उपयुक्त ठरते.

ही पावडर आपल्याला बारीक करून सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये टाकून तिची टेस्ट बनवायची आहे आणि केसांना लावायचा आहे किंवा एरंडेल तेल किंवा कोणतेही खोबरेल तेल यामध्ये मिक्स करून आपण केसांना लावू शकतो. हा उपाय आपल्याला आठवडाभर करायचा आहे ,असे केल्याने तुमचे केस गळत असतील तर ते थांबतील. तुटत असतील तर चांगले राहतील ,टक्कल पडणार नाही यासारखे अनेक समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *