हे मिश्रण लिंबू पाण्यामध्ये टाकून प्या; तोंडातील येणारा घाण वास पूर्णपणे निघून जाईल.!

हे मिश्रण लिंबू पाण्यामध्ये टाकून प्या; तोंडातील येणारा घाण वास पूर्णपणे निघून जाईल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा दुहेरी उपाय करा आणि मुखदुर्गंधी पासून लवकर सुटका करा. आज मी तुमच्यासाठी मुख दुर्गंधीपासून या समस्येला दूर करण्यासाठी एक घरगुती पद्धतीने सर्वात साधा सोपा नैसर्गिक उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने कितीही मोठी मुखदुर्गंधी असू दे क्षणांमध्ये नष्ट होऊन जाईल. मुखदुर्गंधी येण्याचे अनेक कारणे असू शकतात परंतु यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपले पोट साफ न होणे.

पोट साफ न झाल्याने शरीरातील मळ तसाच साचून राहतो आणि त्याचे रूपांतर घाण श्वासामध्ये होते याचे ताजे उदाहरण म्हणजे समजा की तुम्ही एखादी ताजी भाजी आणलेली आहे आणि ताजी भाजी दोन दिवस नंतर खाल्ली तर त्या भाजीला वास येऊ लागतो आणि कुबट वासामुळे आपण ती भाजी खात नाही त्याचबरोबर प्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा जर खूप मोठ्या प्रमाणावर घाण साचली असेल तर त्याचे रूपांतर घाण वासा मध्ये होते आणि परिणामी आपल्या तोंडामधून दुर्गंधी येऊ लागते.

त्याच बरोबर आहे की दुसरे कारण असे की व्यवस्थित ब्रश न करणे, जास्त पाणी न पिणे रात्री झोपताना व सकाळी उठल्यानंतर दात ब्रशने स्वच्छ असावेत यामुळे जंतू निर्माण होत नाही व तोंडाची दुर्गंधी सुद्धा येत नाही त्याचबरोबर पाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्यायला पाहिजे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अन्नाचे कण साचत नाहीत आणि आपले शरीर स्वच्छ राहते. मुखदुर्गंधी कमी होण्यासाठी मदत होते तरीही तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर हा उपाय अवश्य करा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लवंग लागणार आहे. लवंगात असे अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर लवंग मध्ये एक नैसर्गिक गंध असल्याने आपल्या तोंडाची दुर्गंधी कमी करण्यात मदत होते. लवंगामध्ये सोडियम, पोटॅशियम, विटामिन ई , विटामिन सी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दहा ते बारा लवंग लागणार आहेत आणि तीन ते चार वेलची लागणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लवंग व वेलची यांची बारीक पावडर करून घ्यायची आहे .वेलची सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे कार्य करते. वेलची मध्ये फायबर व प्रोटीन सोडियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांचे प्रमाण भरपूर असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेलची व लवंग यांची पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा काळे मीठ या मिश्रणात मध्ये टाकायचे आहे.

काळे मिठामध्ये सोडियम बाय सल्फेट, आयरन हायड्रोजन सल्फाईड यासारखे गुणधर्म उपलब्ध असतात यामुळे मुखदुर्गंधी सारख्या समस्या सुद्धा लवकर बऱ्या होतात अन्नपचन देखील व्यवस्थित होण्यासाठी मदत होते त्यानंतर आपल्याला मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे. जर उन्हाळा असेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही नॉर्मल पाणी वापरू शकता परंतु जर हिवाळा असेल तर हा उपाय करण्यासाठी कोमट पाणी वापरू शकता.

त्यानंतर आपल्याला पाव चमचा हे मिश्रण एका ग्लासमध्ये टाकायचे आहे त्यानंतर थोडेसे मिश्रण एका वाटीमध्ये टाकायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लिंबू सुद्धा लागणार आहे . लिंबू मध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशिअम ,विटामिन भरपूर प्रमाणात असतात. अर्धा चमचा रस आपल्याला वाटी मध्ये टाकायचा आहे आणि नंतर हे चाटण आपल्याला सकाळी नाष्टा करण्याच्या अगोदर चाटायचे आहे त्यानंतर आपल्याला अर्धा एक तास काहीच खायचे नाही.

तसेच आपण ग्लासमध्ये जे मिश्रण टाकलेले आहे ते एकजीव करून रात्री झोपायच्या अगोदर ते मिश्रण प्यायचे आहे असे केल्यामुळे तुमचे पोट पूर्णपणे स्वच्छ होणार आहे आणि आपण वाटी मधील जे चाटण चाटले आहे त्यामुळे तुमची मुखदुर्गंधी कमी होणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय सात दिवस जरी केला तरी तुमच्या मुख दुर्गंधी च्या समस्यांशी निगडीत सर्व समस्या लवकरच बऱ्या होतील हा उपाय अतिशय साधा सोपा आणि घरगुती असल्यामुळे त्याचा कोणताच प्रकारचा दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय अवश्य करा आणि मुखदुर्गंधी पासून लवकरच सुटका मिळवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *