आता आणखी केस गळणार नाही फक्त करा हा एक उपाय; रखरखीत केस देखील होतील मऊ.!

आता आणखी केस गळणार नाही फक्त करा हा एक उपाय; रखरखीत केस देखील होतील मऊ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  जर तुमचे केस पातळ झाले असतील, केस तूटत असतील, डोक्यावर टक्कल पडले असेल तर करा हा उपाय. सध्याच्या काळामध्ये अनेकांना केसांच्या समस्या सतावत आहे.अनेक जण केसांची लांबी वाढवण्यासाठी, केस मजबूत बनण्यासाठी वेगवेगळे रासायनिक पदार्थ सुद्धा वापरत आहे परंतु या उत्पादनांचा वापर केल्यामुळे केसांची काळजी घेणे तर सोडा पण यामुळे केसांवर दुष्परिणाम झालेले सुद्धा पाहायला मिळत आहे म्हणून अनेकदा आपल्या केसांवर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा झालेला आहे.

आज आम्ही तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहोत.हा अत्यंत साधा सोपा व तेवढाच महत्वाचा आहे.या उपायासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहेत ते आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. आपल्यापैकी अनेकांना ती स्त्री असो किंवा पुरुष अनेकांना केस गळणे,केसांमध्ये कोंडा निर्माण होणे, केस पातळ होणे, दिवसेंदिवस केस गळत राहणे, अचानक पणे टक्कल पडणे यासारख्या समस्या सतावत आहेत म्हणून या लेखांमध्ये सांगितलेला उपाय अवश्य करून पाहा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला अळशीच्या बिया लागणार आहेत. अळशी ला आपण जवस किंवा ब्लॅक सीड असे सुद्धा म्हणत असतो. या बीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. या बियांच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनवते त्याचबरोबर केसांची लांबी सुद्धा वाढवण्यासाठी मदत करत असते म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला बी वापरायचे आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दोन चमचा अळशीच्या बिया टाकायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी चांगले आपल्याला उकळायचे आहे जेणेकरून या बियांचा अर्क पाण्यामध्ये उतरेल आणि त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर सुती कापडाच्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला व्हेसलीन वापरायचे आहे.

अनेकदा आपण आपल्या चेहऱ्याची कोमलचा कायम ठेवण्यासाठी व्हेसलीन चा वापर करत असतो आणि हे व्हेसलीन आपली त्वचा अत्यंत नाजूक कोमल ठेवत असते म्हणून एक चमचा व्हेसलीन आपल्याला या मिश्रणमध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण रोज रात्री झोपताना आपल्या केसांच्या मुळाशी लावायचे आहे ,असे आपण आठ दिवस जरी केले तरी तुम्हाला आठ दिवसानंतर फरक जाणवू लागेल.

तुमच्या केसांची लांबी वाढलेली दिसेल, केस गळतीचे प्रमाण कमी झालेले असेल, टक्कल सुद्धा पडणार नाही अशा पद्धतीने हा अतिशय साधा सोपा उपाय पण तेवढाच प्रभावी आहे म्हणून आपल्या केसांचे आरोग्य जपण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *