गहू ऐवजी या धान्याची खा चपाती किंवा भाकरी; तुमची कंबर 32 वरून होईल 28 ची.!

गहू ऐवजी या धान्याची खा चपाती किंवा भाकरी; तुमची कंबर 32 वरून होईल 28 ची.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याचे दिवसांमध्ये तरुणाईमध्ये एक समस्या प्रामुख्याने आढळून येते आहे ती म्हणजे लठ्ठपणा. दहापैकी आठ जणांना तरी अतिलठ्ठपणा ची समस्या होत आहे अतिलठ्ठपणाची समस्या कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या उपाययोजना करतात. अनेक जण जिममध्ये जाऊन व्यायाम करतात,योगा करतात आणि नको नको ते प्रयोग करत असतात. आपल्यापैकी अनेक जण असे आहेत की जे प्रमाण कमी करतात असे अनेक पदार्थ खात असतात तसेच अनेकजण असे सुद्धा आहेत की जे चपाती भाकरी खाण्याचे सुद्धा टाळतात.

असे करणे अत्यंत चुकीचे आहे. खरे तर या सगळ्या समस्या आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे होत असतात. जर आपण आपला आहार योग्य पद्धतीने खाल्ला व त्याचे काही नियम पाळले तर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची अतिरिक्त चरबी निर्माण होणार नाही व यामुळे जर आपल्या शरीरामध्ये काही समस्या निर्माण झाल्या असतील तर आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. या माहितीच्या आधारे तुमच्या शरीरातील अति लठ्ठपणा , कॉलेस्ट्रॉल च्या समस्या पूर्णपणे दूर होणार आहेत,चला तर मग या बद्दल..

आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये चपातीचा व भाकरीचा समावेश करत असतात तसेच ज्वारी पासून बनवलेले अनेक पदार्थ आपण खात असतो. गहू यांच्या पासून बनवलेले पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच अति कॅलरी मुळ सुद्धा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी असे कोणते धान्य आहेत ज्यांचे आपल्या आहारातील समावेश करायला हवा आणि या माध्यमातून आपण आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणार आहोत. आपल्याला गव्हाची चपाती कोंडा सोबत खायचे आहे.

आपण अनेकदा पीठ दळल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गव्हामध्ये असलेला कोंडा काढून टाकतो आणि फक्त गव्हाच्या पिठाची चपाती भरवत असतो तसे पाहायला गेले तर गव्हामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक असतात पण त्याच बरोबर कोंडा मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. म्हणून जर आपण गव्हाची चपाती बनवताना पिठामध्ये कोंडा मिसळला तर आपल्या पोटाच्या संदर्भातील समस्या दूर होतात.

पण त्याचबरोबर जर तुम्हाला हाय प्रेशरची समस्या असेल ती सुद्धा कमी होते. फायबर मुळे आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होत असते व त्याचबरोबर ज्या व्यक्तींना पोट स्वच्छ होत नाही, पोटा संदर्भातील अनेक समस्या उद्भवत असतात अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण वाढवायला हवे कारण फायबरमुळे आपले पोट वेळेवर स्वच्छ होते व त्याचबरोबर आपल्या शरीरातील मेटॅबॉलिझम रेट वाढून आपली पचन व्यवस्था जास्त प्रमाणात कार्य करू लागते आणि परिणामी शरीरामध्ये जर कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर ते सुद्धा कमी होऊ लागते.

फायबरमुळे आपले पोट भरलेले राहते त्यामुळे आपण दिवसभरातून जास्त पदार्थ खात नाही आणि परिणामी आपले वजन सुद्धा वाढत नाही. सोयाबीन पासून बनवलेल्या चपात्या सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात, यामध्ये सुद्धा असे अनेक घटक उपलब्ध असतात जे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरतात सोयाबीनमध्ये ओमेगा फॅटी असिड,प्रोटीनचे प्रमाण जास्त प्रमाणात असते आणि यामुळे आपले शरीर जास्त प्रमाणामध्ये चरबी निर्माण करत नाही आणि परिणामी आपले वजन सुद्धा वाढत नाही.

जर आपण आपल्या आहारामध्ये बाजरीची भाकर जरी समावेश केलातरी आपल्याला फरक जाणवतो त्याचबरोबर ज्या महिलांना मो”नो”पो”ज ची समस्या सतावत आहे अशा महिलांना सुद्धा आपल्या आहारामध्ये बाजरीचा अवश्य समावेश करायला हवा यामुळे आपल्या शरीरामध्ये आवश्यक ते बदल सुद्धा घडतात पण त्याचबरोबर आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणाची समस्या वारंवार त्रास देत असेल तर या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी जे काही धान्य सांगितलेले आहेत त्या सर्वांच्या आधारे आपले जीवन निरोगी अवश्य बनवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *