चुकूनही संध्याकाळी हि ३ कामे मुळीच करू नका; नाहीतर घरात येईल कायमची गरिबी व रोगराई.!

चुकूनही संध्याकाळी हि ३ कामे मुळीच करू नका; नाहीतर घरात येईल कायमची गरिबी व रोगराई.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहात कि संध्याकाळी कोणती अशी कामे आहेत ती आपण चुकून सुद्धा करू नये. ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात राहणार नाही. ति लगेच घरातून बाहेर निघून जाते म्हणूनच चुकुन हि तीन कामे करू नये. हे तीन कामे केल्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होते. श्रीमंती नाहीशी होते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक काम करण्याची एक विशिष्ट अशी वेळ असते आणि योग्य वेळी योग्य काम केल्यामुळे आपल्या त्याचे फळ सुद्धा चांगले मिळतील.

योग्य वेळी योग्य काम केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती ,वैभव नांदू लागते परंतु तेच काम जर आपण चुकीच्या वेळी केले तर आपल्या घरामध्ये अशांती, क्लेश, भांडण, वाद घडू लागतात. घरातील सदस्य एकमेकांसोबत भांडू लागतात. घरामध्ये धन टिकत नाही आणि परिणामी माता महालक्ष्मी अशा घरांमध्ये कधीही राहत नाही. चला तर मग जाणून घेऊ अशीच नेमकी कोणती तीन कामे आहे ती आपण संध्याकाळी केली नाही पाहिजे.  सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे अनेक महिला संध्याकाळी अंगण घर-दार झाडत असतात. संध्याकाळी घरादाराची साफसफाई केल्याने घरातील ही सकारात्मक ऊर्जा असते.

ती घराबाहेर पडते. झाडू हे माता महालक्ष्मी चे प्रतीक आहे म्हणून नाही संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरी येत असते. हे लक्षात ठेवा. सायंकाळची वेळ ही माता महालक्ष्मीचे श्रुष्टीवर येण्याची वेळ मानली जाते, यावेळी माता महालक्ष्मी पृथ्वीतलावर भ्रमण करत असते म्हणूनच माता महालक्ष्मी संध्याकाळच्या वेळी प्रत्येकीच्या घरामध्ये प्रवेश करत असते जर अशा वेळी आपण झाडलोट केली तर माता महालक्ष्मी आपल्यावर नाराज होते होते आणि आपल्या घरामध्ये येत नाही.

जर अगदीच आवशक्यता असेल तर संध्याकाळ होण्याच्या आधी तुम्ही घराची झाडलोट करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर प्रत्येक महिलांनी आपल्या घरातील तुळशीजवळ दिवा लावायला हवा परंतु अनेक ठिकाणी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की तुळशीला दिवा लावत असताना तुळशीला स्पर्श केला जातो. ही अत्यंत वाईट पद्धत आहे म्हणुनच सूर्यास्त झाल्यानंतर तुळशीला व तुळशीच्या पानांना स्पर्श करणे चुकीचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर तुळशीचे पान तोडणे हे धर्मशास्त्रानुसार निषिद्ध मानले गेले आहे.

बरेच जण तुळशीला दिवा लावत असताना तुळशीला पाणी सुद्धा वाहत असतात हे सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे कि तुळशी ही भगवान विष्णूंना खूपच प्रिय आहे म्हणून संध्याकाळी दिवा लावताना आपल्याला काही चुका टाळायला हव्यात. या चुका टाळल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे घरात वादविवाद आणि जर घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला सदस्यांवर आरडाओरड करत असतात.

भांडण-तंटा संध्याकाळी करू नका कारण संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्या घरामध्ये भांडण , वाद-विवाद असतात अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करत नाही त्याच बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की घरातली जी स्त्री आहे तिच्यावर कधीच संध्याकाळच्या वेळेस ओरडू नका कारण की घराची स्त्री हीच माता महालक्ष्मी चे खरे प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्ही या तीन महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली तर तुमच्यावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव धन प्राप्त होइल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *