डोंगराची काळी मैना आहे फारच गुणकारी; दिसेल तिथे थांबून मूठभर तरी खा.!

डोंगराची काळी मैना आहे फारच गुणकारी; दिसेल तिथे थांबून मूठभर तरी खा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  निसर्गाने माणसाला भरभरुन दिलेले आहे. निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उपयोग आपण अनेक वर्षांपासून करत आहोत. आपल्या आजूबाजूला अशी फळे उपलब्ध असतात, ज्या फळांच्या सेवनाने आपण आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतो व आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे सुद्धा उपलब्ध करून देत असतो. काही फळे ही ऋतू हंगामानुसार आपल्याला उपलब्ध होत असतात तर काही फळे ही बाराही महिने उपलब्ध असतात.

त्यातीलच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले एक फळ म्हणजे करवंद. करवंद यांना रानमेवा असे म्हटले जाते कारण की हे फळ आपल्याला डोंगर दरी मध्ये सहजरीत्या उपलब्ध होऊन जाते आणि हे फळ प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध होत असते. या फळाला रानमेवा असेसुद्धा म्हणत असतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण करवंदा विषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या बद्दल..

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये करवंद या फळाला अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. हे फळ चवीसाठी तर उत्तम असतेच त्याचबरोबर आपल्या शरीराला अनेक औषधी गुणधर्म प्रदान करण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. करवंद मध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन उपलब्ध असते म्हणूनच ज्या व्यक्तींना शरीरात रक्ताची कमतरता असते अशा व्यक्तींसाठी करवंद खाणे खूपच गरजेचे ठरते व महत्त्वाचे सुद्धा आहे.

करवंद नेहमी खाल्ल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन ची पात्रता वाढते. करवंद मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते म्हणून ज्या व्यक्तींना त्वचा संबंधित आजार असतात अशा व्यक्‍तींनी नियमितपणे करवंद खाणे गरजेचे आहे त्याचबरोबर विटामिन सी असल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यासाठी मदत होते. करवंदमध्ये सायट्रिक ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणून जर तुम्हाला उष्णता संदर्भात काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी मदत होत असते.

अनेकांना उष्णतेचा त्रास असतो शरीरामध्ये लाही लाही होत असते अशावेळी जर नियमितपणे करवंदाच्या फळांचा रस प्यायला तर आपल्या शरीराला शीतलता प्राप्त होते.जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल, ऍसिडिटी असेल, अपचन झाले असेल तर अशा वेळी थोड्या थोड्या वेळाने करवंदाचा रस सेवन करा यामुळे तुमचा तुम्हाला बरे वाटू लागेल.

करवंद मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने जर तुम्हाला हृदया संबंधित कोणतेही आजार असेल तर ते आजार कमी करण्यासाठी मदत करते कारण की बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे ह्रदय रोग होत असतो अशा वेळी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करणे व रक्ताची पातळी व्यवस्थित करण्याचे कार्य करवंद करत असतो. अनेकांना संधिवात हा आजार असतो या संधिवातामध्ये सुद्धा करवंद महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

अनेक वेळा कधीही जेवण केल्यामुळे आपल्याला पोटामध्ये गॅस होत असतो हा गॅस कमी करण्यासाठीसुद्धा करवंदाचा रस उपयुक्त ठरतो. करवंदाचे पाने सुद्धा आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जर आपण या पानांची बारीक पेस्ट करून त्यामध्ये थोडेसे मध मिसळले तर आणि हेच मिश्रण दिवसभरातून दोन वेळ खाल्ले जर आपल्याला कोरडा खोकला झाला असेल तर तो कोरडा खोकला दूर करण्यासाठी मदत होते. अशाप्रकारे आपल्या शरीरातील वेगवेगळ्या आजारांवर रामबाण ठरणारे करवंद अवश्य खा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *