मंगळवारच्या दिवशी हे काम केल्याने दारिद्र पासून मिळते मुक्ती; फक्त करा हा एक उपाय.!

मंगळवारच्या दिवशी हे काम केल्याने दारिद्र पासून मिळते मुक्ती; फक्त करा हा एक उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंगळवारचा दिवस हा भगवान हनुमान यांचा मानला जातो. या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. हनुमान हे एकमेव असे देवता आहेत की कलियुगात सुद्धा त्यांचे वास्तव्य पृथ्वीतलावर आहे असे मानले गेले आहे. हनुमान जी आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण करत असतात त्यांच्यावर आलेल्या अडचणीतून मुक्तता देत असतात. हनुमान जी यांच्याकडे आठ सिद्धी आहेत आणि या आठ सिध्दीच्या आधारे हनुमान जी आपल्या भक्तांचे कल्याण करतात.

जर तुम्ही मंगळवारी हनुमान जी यांची पूजा आराधना कराल तर हनुमान तुमच्यावर नेहमी प्रसन्न होतील कारण की मंगळवारच्या दिवशी केली जाणारी पूजा हनुमान यांना प्रिय आहे आणि मंगळवार हा त्यांचा आवडता दिवस आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत की या माहितीच्या आधारे जर तुम्ही मंगळवारी हनुमान जी यांची आराधना पूजा-अर्चना केली तर भगवानजी तुमच्यावर लवकरच प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे पूर्ण करतील, चला तर मग जाणून घेऊया ते उपाय नेमके कोणते आहेत त्याबद्दल..

जर आपण मंगळवारच्या दिवशी हनुमान यांच्या मंदिरात गेलो आणि डाव्या हाताने हनुमान जी यांच्या डोक्‍यावरील सिंदूर जर आपण माता सीता यांच्या चरणी अर्पण केले तर आपल्या जीवनातील अडचणी पूर्णपणे दूर होऊन जातात त्याच बरोबर जर आपण एका धागामध्ये चार मिरच्या व त्यानंतर एक लिंबू व तीन मिरची अशा पद्धतीने बनवल्यावर हे लिंबू मिरची जर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व घराच्या प्रवेश द्वाराजवळ लावल्याने आपल्या आजूबाजूला असणारी नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होऊन जाते.

मंगळवारच्या दिवशी सात पिंपळाची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यावर चंदन टिळा लावून श्रीराम असे लिहायचे आहे आणि हे पिंपळाचे पण आपल्याला हनुमान जी यांच्या मंदिरात अर्पण करायचे आहे असे केल्याने आपल्यावरील मोठे मोठे संकट पूर्णपणे दूर होऊन जाते. मंगळवारच्या दिवशी हनुमान जी यांचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते.

जर तुमच्या घरी या दिवशी गाई येते हे सुद्धा शुभ मानले जाते त्याच बरोबर जर तुमच्या अंगणामध्ये लाल रंगाची गाय आली तर हे खूपच शुभ ठरते यामुळे आपल्याला अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा लाभतात.

जर आपण गाईला गूळ चपाती खायला दिली तर कामधेणू आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते तसेच मंगळवारच्या दिवशी श्री गणेश व हनुमान जी यांच्या मंदिरामध्ये जाऊन नारळ अर्पण करायला हवे तसे जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी एका मातीच्या भांड्यामधे नैवेद्यासाठी बुंदी दिल्यास तुमच्यावर हनुमान जी यांची कृपा लवकर होते आणि त्याच बरोबर हा नैवेद्य गरीबांमध्ये वाटल्याने सुद्धा त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात.

असे मानले जाते की जर आपण मंगळवारच्या दिवशी हनुमान जी यांना तुळशी पत्र अर्पण केल्यास आपल्या शरीरातील सर्व आजार विकार पूर्णपणे दूर होऊन जातात व आपले आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला पवित्र मानले गेलेले आहे.

आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर करण्याची शक्ती तुळशीमध्ये असते आणि म्हणूनच जर आपण मंगळवारच्या दिवशी हनुमान जी यांना तुळशीचा हार अर्पण केला तर आपल्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि आपले आरोग्य चांगले राहते.  एका लाल रंगाच्या कपड्यांमध्ये कुंकू आणि रुई चे पान एका आठवड्याभर हनुमान जी यांच्या मंदिरात ठेवावे आणि त्यानंतर त्याची पुरचुंडी बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्याने धनांमध्ये अचानक वाढ होत,  धनसंपत्तीचे योग येऊ लागतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *