अंगाला सुटणारी खाज कितीही जास्त असुद्या या घरगुती उपायाने ३ दिवसांतच होईल मुळापासून नष्ट.!

अंगाला सुटणारी खाज कितीही जास्त असुद्या या घरगुती उपायाने ३ दिवसांतच होईल मुळापासून नष्ट.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  तुमच्या अंगावर कोणत्याही प्रकारची खाज असुद्या ती खाज हा उपाय केल्याने तीन दिवसांमध्ये मुळापासून नष्ट होणार आहे. तसेच खाज, खरुज, नायटा यासारख्या अन्य त्वचाविकारांवर सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अंगाला खाज सुटते,अंगावर लालसर चट्टे येतात, कधी कधी इन्फेक्शन होणे किंवा ऍलर्जी ,त्वचा कोरडी पडण्याची समस्या अशा वेळीसुद्धा अंगाला खाज सुटते या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या व्यक्तिमत्त्वाला सुद्धा परिणाम होत असतो.

शरीरातील सौंदर्य संरक्षण करण्याचे कार्य आपली त्वचा करत असते.आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक बाहेर टाकण्याचे कार्य आपली त्वचा करत असते. अनेकदा सूक्ष्म विषाणूमुळे खाज पायापासून ते अंगापर्यंत वेगवेगळ्या भागांवर हळूहळू सुटत असते आणि परिणामी नंतर काही काळात गंभीर स्वरूप सुद्धा निर्माण करत असते म्हणून जर तुमच्या सुद्धा अंगाला खाज सुटत असेल तर त्यावर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा भविष्यात तुम्हाला परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतील.

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणार आहोत.हा उपाय फक्त तीन दिवस जरी केला तरी तुमच्या अंगावर येणारी खाज पूर्णपणे दूर होणार आहे. हा उपाय करण्यासठी आपल्याला दही लागणार आहे. दही ड्राई स्किन कोरडी त्वचा साठी खूप उपयुक्त असते शिवाय त्वचेवरील मृतपेशी आहे त्या बाहेर काढून टाकण्यासाठी ,कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.

हा उपाय करण्यासठी दुसरा पदार्थ आपल्याला वापरायचे आहे ते म्हणजे कडुलिंबाची पाने. कडू लिंबाच्या पानांना अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे यातील औषधी गुणधर्मामुळे शरीरावरील अनेक विषाणू कीटक दूर करण्यासाठी या पानांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या कडूलिंबाच्या पाण्यामध्ये अँटी फंगल,अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस कडुनिंबाची पाने घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचा दही टाकायचे आहे आणि त्यानंतर या मिश्रणाची पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट तयार झाल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला खाज खरुज आहे अशा प्रभावित जागेवर लावायचा आहे.हा उपाय आपल्याला तीन दिवस करायचा आहे. दिवसभरातून दोन वेळा तरी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या शरीरावरील खाज पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे त्याचबरोबर हा अत्यंत आयुर्वेदिक उपचार असल्याने या उपचाराने तुमच्या शरीरावर कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम सुद्धा होणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *