पावसातील चिखल्या दूर करण्याचे हे रामबाण उपाय एकदा अवश्य बघा; उपाय वाचून तुम्हीही व्हाल थक्क.!

पावसातील चिखल्या दूर करण्याचे हे रामबाण उपाय एकदा अवश्य बघा; उपाय वाचून तुम्हीही व्हाल थक्क.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  पावसाळा आला की त्यासोबत अनेक शारीरिक समस्या सुद्धा निर्माण होत असतात. सर्दी-खोकला, त्वचेचे आजार इत्यादी समस्या निर्माण होत असतात. सध्याच्या काळामध्ये वातावरणातील बदलामुळे पाऊस कधी पडतो यामुळे अनेकांना बदललेल्या वातावरणाचा त्रास होऊ लागतो. उदाहरणार्थ सर्दी-खोकला-ताप, अंगावर लाल पुरळ येणे, अंग लाल होणे इत्यादी त्वचेच्या समस्या जाणवू लागतात.

परंतु जेव्हा आपण पावसाळा या ऋतु बद्दल बोलू लागतो तेव्हा या ऋतूमध्ये एक समस्या सर्वांना जाणवत असते ती म्हणजे पायातील चिखल्या. हि समस्या आपण दिवसभर पाण्यामध्ये उभे आपण राहिल्यामुळे आपले पाय नरम होतात व पायाची त्वचा निघू लागते .या ची चिखल्या साधारणतः दोन बोटांच्या मधल्या भागावर होत असतात त्यामुळे बोटाजवळ खाज व जळण होत असते.

जेव्हापण पायामध्ये बूट घालतो ,बोटातील ओलसरपणामुळे पायाला गारवा जाणवू लागतो. हे कारण सुद्धा चिखल्या निर्माण होण्याचे लक्षण असते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये चिखल्या होऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत ,चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल बद्दल..

चिखल्या होऊ नये म्हणून अगदी साधी सरळ व सोपे घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही कोणत्याही खर्चा शिवाय करू शकतात. चिखल्या होऊ नये म्हणून किंवा झालेल्या प्रभावित जागेवर तुम्हाला खोबरेल तेल लावायचे आहे. खोबरेल तेल हे असे घटक आहे त्यामध्ये कोणताही आजार त्वचेशी निगडित असून त्याला नष्ट करण्याचे प्रभावी असे उपचार म्हणून खोबरेल तेलाकडे पाहिले जाते.

त्याचबरोबर जेव्हा आपण चिखल्या झालेल्या प्रभावित जागेवर खोबरेल तेल लावतो तेव्हा तेलामुळे पाणी प्रभावित जागेवर स्पर्श करत नाही. जसे की तुम्हा सर्वांना माहितीच असेल की जर आपण पाण्यामध्ये तेल टाकल्यास तेल हे पाण्याच्या वर तरंगते त्याच पद्धतीने जर आपण जखमेवर तेल लावल्यास पाण्याचा स्पर्श जखमेवर होणार नाही.त्याचबरोबर या उपायासाठी आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हळद.

हळदीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे, त्याचबरोबर हळदी मध्ये रोगप्रतिकारक क्षमता व शरीराला अन्य रोगांपासून संरक्षण करण्याची शक्ती प्राप्त झालेली असते म्हणूनच जर तुमच्या पायाला चिखल्या झाल्यास जखमेवर थोडीशी हळद व त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स केल्यास ते मिश्रण जखमेवर लावल्याने लवकरच फरक पडतो व काही दिवसांमध्येच चिखल्या पूर्णपणे नाहीशा होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *