या दोन गोष्टी चुकूनही दान करू नका मरण ओढवून घ्याल… बरबाद व्हाल…

या दोन गोष्टी चुकूनही दान करू नका मरण ओढवून घ्याल… बरबाद व्हाल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार दानधर्म करणे पुण्यकर्म मानले जाते. मान्यता आहे जे लोक दानधर्म करत राहतात त्यांच्या आयुष्यात कधीही अडचणी येत नाहीत. जर तुम्हाला दानधर्म करायची सवय असेल किंवा तुम्ही दानशूर असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

दानधर्म करताना चुकून तुम्ही या दोन गोष्टी तर दान करत नाहीत ना? या दोन गोष्टींचे दान केल्याने करोडपती लोकसुद्धा एका रात्रीत भिकारी होऊन जातात. महान नीती तज्ञ चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीती मध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आढळतो की, कितीही श्रीमंत आणि दानशूर असलेल्या व्यक्ती कडे सोने चांदीचे खजाने भरून पडलेले आहेत.

परंतु जाणून बुजून अथवा न जाणतेपणाने या दोन गोष्टींचे दान केले असेल तर जीवनात त्याला कंगाली आणि दरिद्रता यांचा सामना करावा लागतो. मित्रांनो ही माहिती पूर्णपणे नीट वाचा आणि समजून घ्या.

तुम्ही जर तुमच्या घरातील दरिद्री दूर करू इच्छिता आणि तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांचे सच्चे भक्त असाल तर श्रीकृष्ण यांचे स्मरण कायम करत रहावे. श्रीकृष्ण तुमच्या सर्व व्यथा ऐकून तुम्हाला गरिबी मुक्त करतील.

प्रत्येक घरात आणि समाजात दान देणे भाग्याचे मानले जाते. असं म्हणतात दान केल्याने तुमच्या कार्यातील प्रत्येक अडथळा दूर होतो. प्रत्येक धर्मामध्ये दान करणे शुभ मानले जाते आणि हे एक मानवतेचे प्रतीक देखील आहे.

परंतु, शास्त्रानुसार आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात की ज्यांना चुकून सुद्धा आपण बाहेर काढले नाही पाहिजे. चाणक्य सांगतात की आपण वापरलेले कपडे कोणालाही दान म्हणून देऊ नयेत. याच कपड्यांवर टोने टोटके करून आपल्यावरती तंत्रविद्येचा वापर करून तुम्हाला गरीब बनवू शकतात.

तांत्रिक लोक या कपड्यांचा तुमच्याविरुद्ध वापर करू शकतात. तुमचे वापरलेले कपडे तुमचे दुश्मन कशाही प्रकारे मिळवून त्याचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे या गोष्टीचे ध्यान ठेवा आपण आपले वापरलेले कपडे कोणासही दान मध्ये देऊ नये.

भगवान श्रीकृष्ण आपल्या कृष्ण वाणी मध्ये सांगतात की, जी व्यक्ती आपल्या हातातील वापरत असलेली घड्याळ कोणाला देत असतील तर त्या सोबत तुमचा चांगला काळ देखील त्या व्यक्तीकडे जातो.

यामुळे ही चूक तुम्ही चुकून सुद्धा करू नका. आपल्या हातात घातलेलं घड्याळ कुणालाही देऊ नका. असं करून तुम्ही आपल्या भाग्यातील सुखाच्या गोष्टी त्यांना देत आहात आणि असं करून तुम्ही स्वतःवर अन्याय करता.

तुम्ही अशाच वस्तूंचे दान करा जे ईश्वरीय भक्तीमध्ये ईश्वराला प्रिय आहेत जसे की तुम्ही गहू, चपाती, गुळ, काळे तीळ अशा काही वस्तू दान करा ज्यांना शास्त्रामध्ये वर्जित मानले नाही. बास आजची माहिती इतकीच!

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *