तुमच्या हातावर जर अर्धचंद्र असेल…तर ही माहिती नक्की वाचा…हस्त रेखा ज्ञान !

तुमच्या हातावर जर अर्धचंद्र असेल…तर ही माहिती नक्की वाचा…हस्त रेखा ज्ञान !

नमस्कार मित्रांनो,

असे मानले जाते की, आपल्या हातावरील रेषांवर आपले भाग्य अवलंबून असते. जर तुमच्या तळ हातावर अर्धचंद्र बनत असेल, तर याचे काय रहस्य आहे? हे आज आपण पाहणार आहोत.

असे म्हणतात आपल्या तळ हातांच्या रेषांवरून भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ समजू शकतो. हातावरील रेषा कायम आपल्याला उत्साही करत असतात. प्रत्येक जणांना जाणून घेण्याची इच्छा असते की, त्याच्या हातावरील रेषा भूत, भविष्यात आणि वर्तमानाबाबत काय सांगतात.

ज्योतिष विद्यानुसार तळ हातावरील रेषा आपले भाग्य आणि नियती जीवन काल दाखवत असतात. ही अशी विद्या आहे ज्यात ज्योतिष आपल्या हातांच्या रेषा पाहतात. काही जण कपाळावरील आणि पायाच्याही रेषा पाहतात.

हस्तरेषा तुमचे आरोग्य आणि इतर गोष्टीबाबत माहिती देतात. इतकेच नाही तर तुमच्या जीवनात होणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांबद्दल ह्या हस्तरेषा सांगतात. तुम्ही कायम तळ हातावर बनणाऱ्या अर्धचंद्र बाबत उत्सुक असाल.

चला तर जाणून घेऊया अर्धचंद्राचा काय अर्थ होतो ते आपण जाणून घेऊया. तुम्हाला माहीत नाही तुमच्या तळ हातावर अर्धचंद्र होतो कसा? तर त्यासाठी तुमच्या दोन्ही तळ हातांना जवळ आणा. त्यानंतर सर्वांत वर असणारी उजवा आणि डाव्या हाताची रेषा एकमेकांना जुळवा.

त्यातून जो आकार बनला तो अर्धचंद्र असतो. रेषा नाही मिळाल्या आणि अर्धचंद्र नाही झाला तर त्याचाही वेगळा अर्थ आहे. ज्यांच्या तळ हातावर अर्धचंद्र झाला त्यांना कलकलाट नाही त्यांना शांतता आवडते. ज्यांच्या हातावर अर्धचंद्र बनतो,

त्या व्यक्ती खूप सुंदर आणि ऍक्टिव्ह स्वभावाचे असतात.
अशाप्रकारचे लोक आपली मैत्री कायम ठेवतात. आपल्या मित्रांशी खूप इनामदार असतात. अशा व्यक्तींची बुद्धी खूप चाणाक्ष असते. ते बुद्धिमान असतात तर प्रत्येक गोष्ट आठवण्याची क्षमता अधिक असते.

अनेक वर्षापूर्वीच्या गोष्टीही त्यांना खूप स्पष्टपणे आठवतात. असे व्यक्ती आपले प्रेम मिळवण्यात धडपड करतात. आपल्या मनातील गोष्टी मनातच ठेवतात. स्वतःहून कोणाशी बोलत नाहीत. या व्यक्ती खूप हुशार असतात व प्रत्येक काम चांगल्याप्रकारे ते पूर्ण करतात.

त्याशिवाय कोणतेही संकट आले तरी घाबरून न जाता त्या संकटांचा सामना करतात. अशा व्यक्ती आपल्या जीवनसाथीच्या प्रतीक खूप भावूक असतात. परंतु आपल्या भावना या इतरांकडून लपवण्याचा प्रयत्न करत असतात.

या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात. त्यामुळे कोणतेही संकट यांच्यासाठी मोठे नसते. जर दोन्ही हातांच्या रेषा जोडल्यास अर्धचंद्र न होता सरळ रेष बनत असेल तर ती व्यक्ती खूप शांत व दयाळू स्वभावाची असते. याना प्रत्येक काम शांततेने व आरामात करायला आवडते.

असे मानले जाते की, सरळ रेष असणाऱ्या व्यक्ती खूपच कमी असतात. जर दोन्ही हात जुळवल्यास या दोन्ही रेषा जुळत नसतील, एक रेष खाली व एक रेष वर राहत असेल व वाकडी तुकडी, तिरकी दिसत असेल तर अशा व्यक्तींना आपल्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तींबरोबर राहायला आवडते.

या व्यक्ती इतरांचा व समाजांचा काहीही विचार करीत नाहीत. यांना लोक काय म्हणतील किंवा आपल्याबद्दल काय विचार करतील याबद्दल काहीही वाटत नाही.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *