जर मांजर आडवी गेली तर काय होते? खरंच मांजर आडवे जाणे अशुभ असते, जाणून घ्या.

जर मांजर आडवी गेली तर काय होते? खरंच मांजर आडवे जाणे अशुभ असते, जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो,

आपल्या देशात शकुन अपशकुन, श्रद्धा-अंधश्रद्धा खूप मानले जातात. ही पद्धत आपल्याकडे शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. काही व्यक्ती या सर्वांकडे श्रद्धेने पाहतात तर काही व्यक्तींना हे सर्व अंधश्रद्धा वाटते. परंतु पूर्वीपासून ही पध्दत चालत आलेली असल्याने आपल्याही मनात याविषयी थोडी भीती आणि थोडी उत्सुकताही वाटत असते.

आपल्यालाही जाणून घ्यायचे असते की, हे खरे आहे का? असे काही खरोखर असते का? आजच्या या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत मांजराविषयी. असे म्हटले जाते की, आपण जर काही महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडलो आणि रस्त्याने जर आपल्याला मांजर आडवे गेले तर तो अपशकुन असतो. आपले ते कार्य पूर्ण होत नाही आणि एखादे अशुभ घटनाही घडू शकते.

परंतु खरोखरच असे काही असते का? असे म्हणतात की, आपण रस्त्याने जात असताना मांजर आडवी गेली तर 5 पावले मागे फिरावे. मग पुढे जावे. किंवा खूपच महत्वाचे काम असेल तर थोड्या वेळ एखाद्या झाडाखाली किंवा हॉटेलमध्ये थांबून पाणी प्यावे मगच पुढे जावे. तरच आपले ते कार्य पूर्ण होते नाही तर आपल्याला त्यात अपयश येते.

असे मानले जाते की, एखाद्या वेळी आपण बाहेर जात असताना मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर आपल्याला प्रवासात काही दुखापत होऊ शकते किंवा आपले नुकसान होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की, मांजर आडवे जाणे अशुभ आहे. याचा खरा अर्थ असा आहे की, पुढे काही घटना घडणार असतील तर त्याचा पूर्व भास मांजरीला पूर्वीच होऊन जातो.

म्हणून त्या संकटाची कल्पना आपल्याला देण्यासाठी मांजर आपल्या मार्गात आडवी जाते. म्हणजे त्या संकटापासून आपण सावध राहू शकतो. म्हणूनच आता ज्यावेळी मांजर आपल्याला आडवी गेली त्यावेळी समजून जावे की, काही तरी संकट आपल्यावर येणार आहे. आणि त्यासाठी मनाची तयारी करून ठेवावी. परंतु मांजर रस्त्याने आडवी जाणे नेहमीच अशुभ नसते.

मांजर आपल्या डाव्या बाजूला गेले आहे की, उजव्या बाजूला यावरून त्याचे शुभ अशुभ परिणाम दिसून येतात. शकुन शास्त्रानुसार मांजरीने डाव्या बाजूने रस्ता कापणे अशुभ मानले जात नाही. परंतु जर मांजर आपल्या उजव्या बाजूने गेली तर ते अशुभ मानले जाते. म्हणूनच जर मांजरीने उजवीकडून आपला मार्ग ओलांडला असेल तर थोडा वेळ थांबावे व मगच पुढे जावे.

मांजरीविषयी असे अनेक शुभ अशुभ बाबी शकुन शास्त्रात दिलेले आहेत. असे मानले जाते घरातील दूध जर मांजर पिऊन पळून गेली की, हे संपत्तीचे नुकसान होण्याचे संकेत आहेत. मांजरीने घरातील दूध पिणे हे खूप अशुभ आहे. यामुळे आपल्या घरातील संपत्ती नष्ट होते.

कारण दूध हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि घरातील दूध जर नष्ट झाले तर आपली संपत्तीही नष्ट होते. जर घरात येऊन 2 मांजर भांडण असतील किंवा रडत असतील तर हे सुद्धा खूप अशुभ मानले जाते. मांजरी जर घरात येऊन भांडत असतील तर आपल्या घरात भांडण तंटे व वाद विवाद होऊ शकतात.

तसेच मांजर घरात येऊन रडणे हे एखाद्या वाईट घटनेचे सूचक आहे. एखादी व्यक्ती झोपेत असताना त्या व्यक्तीच्या अंगावर मांजर पडणे याचा अर्थ ती व्यक्ती एखाद्या रोगाने पिडीत होऊ शकते.

तर मित्रांनो शकुन शास्त्रानुसार मांजरीबद्दल हे काही संकेत आहेत. ते मानणे किंवा न मानणे हे ज्याचे त्याचे ज्याने त्याने ठरवावे. काही जण या सर्वांकडे श्रद्धेने पाहतात तर काहींना या अंधश्रद्धा वाटतात. परंतु शास्त्र आहे म्हणजे त्यात काहीतरी तथ्य आहे हे विसरून चालणार नाही.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *