कापराचे हे जादूई फायदे; अनेक रोगांना मिनिटांतच दूर करते.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण कापूर पूजेसाठी वापरत असतो. या पूजेसाठी वापरला जाणार्या कापूराचे बरेच फायदे आहेत.बऱ्याच जणांना याची कल्पना नसेल त्यामुळे आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कापूर विषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. जर तुम्हाला भाजले असेल अशावेळी कापूर त्या ठिकाणी लावला तर लवकर बरे होते आणि संसर्गाचा धोका टाळता येतो तसेच घरामध्ये कापूराचा धूर गेल्याने जंतू नष्ट होतात त्यामुळे आजाराचा संसर्ग होत नाही.
दात दुखत असल्यावर दातामध्ये वेदना होत असेल , कीड लागली असेल तर अशावेळी कापूराची बारीक पावडर करून त्या ठिकाणी लावली तर त्वरित आराम मिळतो. घरामध्ये रूम फ्रेशनर साठी कापूर वापरला तर सुवास घरामध्ये नक्की पसरतो. पाण्यामध्ये कापूराची पूड मिसळावी आणि ते पाणी जर घरांमध्ये सर्व ठिकाणी शिंपडले तर मुंग्या वगैरे नष्ट होतील मग तुम्हाला कसला त्रास होणार नाही.
कापूराच्या वड्या कापडामध्ये बांधून बिछानाखाली ठेवल्याने मच्छर , डास तुमच्या जवळपास येत नाही. जर पोट दुखत असेल तर ओवा पुदिना याच्यामध्ये कापुराच्या वड्या तिथे मिसळावे त्याच्याने पोट दुखी थांबते. ज्या वेळी कान खूप दुखत असेल अशावेळी कापूर चा रस कानामध्ये थोडासा टाकल्याने आपली कानदुखी लगेच बंद होईल.
हात दुखत असेल,गुडघ्याचा त्रास होत असेल अशा वेळी कापूराच्या तेलाने मालिश केल्याने वेदना लगेच थांबतात व आपल्याला लगेच आराम मिळतो. बरेच जणांच्या त्वचेला ,अंगाला खाज येते तर अशा ठिकाणी कापूर लावला तर खाज येणे लगेच बंद होते. केसांमध्ये कोंडा झाला असेल, केस पांढरे होत असतील तर अशावेळी खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून ते तेल केसांना लावल्याने कोंड्याचा त्रास कमी होतो.
पांढरे केस काळे होण्यास मदत मिळते. गरम पाण्यामध्ये थोडंसं कापूर आणि मीठ घालून आपले पाय त्या पाण्यामध्ये टाकून शेक घेतल्याने आपल्याला फरक जाणवतो तसेच स्क्रॅप करून मोशरायझर क्रीम लावली तर पायांच्या भेगा कमी होतात. या सगळ्या समस्या कापूर मुळे दूर होतात. ऑली ऑइल मध्ये कापूर मिक्स करून जर डोक्याची मालिश केली तर डोके दुखणे आहे ते थांबते तसेच कापूराचे अनेक आयुर्वेदिक फायदे आपल्याला मिळतात.
कापुराच्या अंगी अँटी बॅक्टरियल गुणधर्म असल्याने आपल्या आजूबाजूला जर कोणत्याही प्रकारचे वायरल इन्फेक्शन चे विषाणू असतील तर ते विषाणू सुद्धा लवकरच मृत पावतात आणि आपल्या आजूबाजूला चांगले वातावरण तयार होते. कापुराचे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्व तर आहेच पण त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्टीकोनातून सुद्धा अनेक महत्त्व सांगण्यात आलेले आहे आणि म्हणूनच कापुर आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतो त्या धूराच्या सहाय्याने आपण आपले आरोग्य चांगले बनवू शकतो म्हणून कापुराचा वापर करून आपले जीवन चांगले बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.