बायकोची ही 1 गोष्ट कधीही कुणालाही सांगितली नाही पाहिजे; नाहीतर….
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बलशाली व्यक्तीची ताकद त्यांच्या हातामध्ये असते. एका ब्राह्मणाची ताकद त्याच्या अध्यात्मिक ज्ञानामध्ये असते तर एका स्त्रीची ताकद तिच्या सौंदर्यामध्ये आणि तिच्या मधुर आणि गोड अशा शब्दांमध्ये असते आणि म्हणून फक्त स्त्रीने च नव्हे तर प्रत्येकाने गोड शब्दांचा, मधुर शब्दांचा वापर करायला हवा. आज आपण या लेखात अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
चाणक्य नीति मधील सातव्या धड्यातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी अशा गोष्टी ज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयोगी आहेत. जीवन कसे जगावे आणि चतुराईने कसे वागावे, असे शिकवणाऱ्या या गोष्टी आहेत. समोरची व्यक्ती जर तुमच्या पेक्षा जास्त शक्तिमान असेल, तुमच्या पेक्षा जास्त श्रेष्ठ झाली असेल तर अशा व्यक्तीशी पंगा घेऊ नका. तिच्याशी शत्रुत्व ओढवून घेऊ नका कारण ती तुमच्यापेक्षा बलवान आहे त्यामुळे तिच्या पुढे तुमचा निभाव कसा लागणार नाहीये ,अशा व्यक्तीशी गोड बोलून राहावे. गोड बोलूनच तिचा काटा काढावा.
समोरची व्यक्ती जर दुष्ट असेल तर अशा व्यक्तीशी गोड बोलून काहीही साध्य होत नाही, ज्या व्यक्तीशी जशास तसे वागावे कारण जर तुम्ही तिच्याशी गोड बोललात तर अशा दुष्ट व्यक्ती हळू-हळू तुमच्या वरती स्वार होतात. तुमच्यावरती कुरघोडी करू लागतात आणि तुम्हाला जास्त त्रास देऊ लागतात त्यामुळे या व्यक्तीशी जशास तसे वागणे ही नीती वापरण्यात सर्वात योग्य असते. समोरची व्यक्ती जर तुमच्या बरोबरीचे असेल तिची ताकद ही तुमच्या ताकदीला बरोबरी करणारी असेल तर अशा व्यक्ती दोन प्रकारे आपल्याला वाचता येईल.
एक तर तुम्ही त्याच्याशी गोड बोलून बघा. जर तो गोड बोलून ऐकत नसेल तर तुम्ही स्वतःच्या ताकतीचा बलाचा त्या ठिकाणी उपयोग करू शकता म्हणजेच साम-दाम-दंड-भेद हे चारही प्रकार वापरून तुम्ही त्या व्यक्तीला नमऊ शकता. आज जगामध्ये सर्व व्यक्ती एकमेकांना खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत असतात.प्रत्येक व्यक्तीला दुसरा माणूस मोठा झालेला खपत नाही त्याला ते चालत नाही आणि म्हणून अशा गोष्टी आहेत की ज्या तीन गोष्टी तुम्ही चुकूनही कोणालाही सांगू नका. प
हिली गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात तोटा झाला ,तुमची धनसंपत्ती कमी झाली, तुमची एखादी वस्तू हरवली कोणत्याही कारणाने जर तुम्ही कंगाल झाला तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका कारण लोक पैशावर प्रेम करतात. पैसे आल्यावर ज्या दिवशी तुमचा पैसा जाईल त्या दिवशी लोक तुमची इज्जत करणे कमी करतील.
तुम्हाला मान सन्मान देणार नाहीत. या जगामध्ये पैशाला सर्वोच्च स्थान साथी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पती-पत्नीमध्ये कधी कधी भांडण होते आणि कधीकधी पत्नीकडून बायकोकडून आपलाच अपमान झाला तर ही गोष्ट कधी ही सांगू नका. अगदी तुमच्या जवळच्या मित्राला सुद्धा नाही कारण जर तुम्ही ही गोष्ट सांगितली तर जग तुमच्यावर हसेल आणि वारंवार तुमचा या गोष्टीवरून अपमान करेल त्याची पत्नीच त्याची इज्जत करत नाही तर आपण का द्यावी अशी भावना मनात ठेवतील.
चुकीचा असा विचार जगाच्या मनामध्ये नक्की येतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा कुठेही ,ऑफिसमध्ये ,कामाच्या ठिकाणी किंवा कोठेही जर अपमान झाला तर तो अपमान सहन करायला शिका. त्या अपमान बद्दल बाहेर कुठेही वाच्यता करू नका कारण लोक फक्त तुमची गंमत बघण्यासाठीच आहे. तुमची मजा कशी उडवता येईल .तुम्हाला खाली कसे दाखवता येईल यासाठी फक्त लोक टपून बसलेले आहेत. या जगामध्ये प्रत्येकजण दुसऱ्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे लोक वागतात आणि म्हणून आपल्या झालेला अपमान कुठेही बाहेर सांगू नका. अपमानाचा बदला कसा घ्यायचा त्याविषयी विचार करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.