समोरचा हात जोडून उधार पैसे तीन दिवसात परत करेल; फक्त हे तीन उपाय करून पहा.!

समोरचा हात जोडून उधार पैसे तीन दिवसात परत करेल; फक्त हे तीन उपाय करून पहा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा पैश्यांची गरज असते तेव्हा तो व्यक्ती आपल्याशी खूप गोड बोलत असतो. एकदा पैसे घेतल्यानंतर आपला फोन सुद्धा उचलत नाहीत .अनेक लोक तर असे आहेत की पैसे परत तर देतच नाहीत मात्र धमकी देऊ लागतात आम्ही काय कुठे पळून जात आहे का ? आम्ही काय तुमचे पैसे बुडवणार आहोत का? बऱ्याच जणांनी अगदी कर्ज काढले आणि कर्ज काढून एखाद्याची गरज भागवली,त्याची गरज भागली त्या व्यक्तीने गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीचा खरोखर वापर करून घेतला आहे असे उसने पैसे बुडवणारे लाखो लोक आहेत.

मित्रांनो आज आपण एक असा प्रचंड प्रभावशाली आणि वशीकरणयुक्त उपाय जाणून घेणार आहोत की ज्याने तुमचे पैसे बुडवले आहेत उधार पैसे घेतले पण तो परत करत नाहीये त्याला वश करणारा हा उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करू लागतील आणि तुमचे पैसे परत करण्याचा निश्चय करेल. त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर दोन ते तीन दिवसात तुमचा पैसा तुमच्याकडे परत येईल किंवा ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीकडे पैसे येतील तेव्हा तो तुमचे पैसे परत करू लागेल..

त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की जेव्हा आपण एखाद्या उपाय व टोटका करत असतो तेव्हा तो उपाय अगदी विश्वासाने करायला हवा. जर आपण उपाय करताना मनामध्ये कोणतीही शंका आली तर त्याचा आपल्याला हवा तेवढा फरक जाणवत नाही आणि परिणामी त्या उपायांचा सुद्धा आपल्याला फळ प्राप्त होत नाही.आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय करणार आहोत तो उपाय म्हणजे खडेमीठ. बाजारामध्ये खडेमीठ सहज उपलब्ध होते.खडे मीठ म्हणजे जाडे मीठ.

या मिठाचा उपयोग करून तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये खूप सार्‍या गोष्टी प्राप्त केले जातात तसेच या मिठाला तंत्र मंत्र शास्त्र वशीकरण या सगळ्या शास्त्रांमध्ये मोठे महत्त्व देण्यात आलेले आहे. असे मोठ्या मिठाचे आपल्याला 11 खडे घ्यायचे आहेत. एका लाल कपड्यांमध्ये आपल्याला हे मिठाचे 11 खडे ठेवायचे आहेत. सोबतच अकरा साबुत लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्याला हा उपाय करण्यासाठी अखंड लवंग घ्यायचे आहेत.

कुठेही तुटलेली लवंग अजिबात घ्यायची नाही तसेच आपल्याला हा उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. जर तुम्हाला हा उपाय मंगळवारच्या दिवशी करणे शक्य नाही झाले तर तुम्ही शनीवारी हा उपाय आवश्‍यक करू शकता. शनीवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. हा उपाय आपल्याला सूर्य मावळल्यानंतर म्हणजेच रात्री करायचा आहे. मिठाचे खडे आणि लवंग एकत्र ठेवून आपल्याला लाल कपड्यांमध्ये बांधायचे आहे व त्याची पुरचुंडी बनवायची आहे.

ही पुरचुंडी बनवल्यानंतर आपल्याला त्या पुरचुंडी वर सात वेळा थाप मारायची आहे. ही थाप मारताना आपल्याला आपल्या शत्रू चे नाव घेऊन थाप मारायची आहे जेणेकरून आपण प्रत्यक्षरित्या त्यालाच थाप मारत आहोत असे आपल्या मनामध्ये भावना निर्माण करायची आहे. आता आपल्याला ही पुरचुंडी चार रस्ता म्हणजे जिथे चौक असतो अशा ठिकाणी गुपचूप ठेवायची आहे.

हा उपाय आपल्याला आपल्या घरातच करायचा आहे आणि उपाय झाल्यानंतर ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी ही पुरचुंडी आपल्याला गुपचुप जाऊन ठेवायची आहे. त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे.धनाची देवता माता महालक्ष्मी यांचा वार हा शुक्रवारचा दिवस असतो आणि जर आपल्याला माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करायचा असेल तर माता महालक्ष्मी यांना शुक्रवारच्या दिवशी केलेले उपाय प्रिय असतात आणि त्यामुळे आपल्यावर माता महालक्ष्मीची कृपा दृष्टी सुद्धा लवकर होते.

शुक्रवारच्या दिवशी आपल्याला कापुरापासून काजळ निर्माण करायचे आहे त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये कापूर घ्यायचे आहे आणि ते जळवायचे आहे. कापूर जळल्यानंतर त्याचा जो धूर निघणार आहे तो धूर आपल्याला एका ताटलीवर जमा करायचा आहे आणि असे केल्यानंतर ताटली वर एक काळा थर जमा होईल हाच तो काळा थर म्हणजे काजळ होय.

हे काजळ तयार झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहे. एका वाटीमध्ये दोन ते तीन थेंब मोहरीचे तेल टाकायचे आहे. मोहरीचे तेल हे आपल्या बाजारांमध्ये सुद्धा सहज उपलब्ध होते त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर एका पांढर्‍या कागदावर आपला शत्रूच असे नाव या मिश्रणाद्वारे लिहायचे आहे. तुम्ही ज्या व्यक्ती बद्दल विचार करत आहात तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्ती बद्दल भावना आहेत अशा व्यक्तींसाठी हा उपाय लागू पडू शकतो.

एका कागदावर या मिश्राने नाव लीहल्यानंतर आपल्याला सात वेळा त्या कागदावर थाप मारायची आहे. त्यानंतर आपल्याला हा कागद आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे तिजोरी नसेल तर अशावेळी तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे वधना अलंकार ठेवतात अशा ठिकाणी आपल्याला हा कागद ठेवायचा आहे आणि त्या कागदावर एखादी जड वस्तु आपल्या ठेवायची आहे. हा उपाय केल्याने आपले पैसे घेतलेले आहेत त्या व्यक्तीवर या उपायांचा परिणाम होतो आणि त्या व्यक्तीचे मन परिवर्तन होऊन तो व्यक्ती आपले पैसे परत करू लागतो. पैसे परत मिळविण्या साठी असा हा एका शक्तीशाली उपाय आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *