घरातील एखादी खोली अनेक दिवसांपासून बंद असेल तर सावधान; तुमच्यासोबत होऊ शकते असे काही….

घरातील एखादी खोली अनेक दिवसांपासून बंद असेल तर सावधान; तुमच्यासोबत होऊ शकते असे काही….

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडतात की त्या घटनेमुळे आपले मन विचलित होऊन जाते. या घटना घडण्यास कुठेतरी आपण कारणीभूत असतो परंतु या जर घटना घडू नये म्हणून आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर भविष्यात आपल्याला धोका उद्भवणार नाही. जेव्हा आपण ज्या ठिकाणी राहतो तेव्हा आपल्या घरामध्ये एकापेक्षा अधिक खोल्या असतील तर त्या खोल्या आपण नेहमी उघड्या ठेवायला पाहिजे.

आपल्यापैकी अनेक जण घरामध्ये कमी माणसांचा वावर असल्याने त्या खोल्या बंद ठेवत असतात आणि अचानक नको त्या घटना घडू लागतात लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

एका घरामध्ये एक खोली अनेक वर्षांपासून बंद होती, ते घरदार हे अनेक वर्षांपासून बंद होते त्या खोलीत कोणाचाही वावर नव्हता.हळूहळू त्या घरातील लोक एकापाठोपाठ एक आजारी पडू लागले. अनेक प्रकारच्या बाधा हा त्या ठिकाणी उत्पन्न होऊ लागल्या.काही अदृश्य शक्तींचा वावर त्या घरातील लोकांना आसपास दिसू लागल्या.आपल्या घरामध्ये ज्या खोल्या असतात त्या प्रत्येक खोलीमध्ये दिवसातून कमीत कमी पाच ते दहा मिनिटे का होईना मनुष्याचा मात्र त्यांचा वावर असायला हवा.

जर अनेक दिवस अनेक वर्ष खोली उघडली नसेल तर अशा ठिकाणी उपद्रवी प्राणी प्रवेश करतात. घरातील खोलीमध्ये पाली , कोळी किंवा अन्य कीटक प्राणी असतील यांचे वर्चस्व त्या खोलीमध्ये राहते त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशा काही दुष्ट शक्‍ती असतात त्या दुष्ट शक्तींना अशाच प्रकारची जागा हवी असते आणि अशा वेळी जर आपल्या घरातील एखादी खोली नेहमी बंद असेल तर अशा ठिकाणी या दुष्ट शक्‍ती वास्तव्य करतात.

हळू हळू या वाईट शक्ती पूर्ण घरावर ताबा मिळवतात आणि त्या घरांमध्ये राहणाऱ्या सदस्यांना अनेकदा त्रास सुद्धा सहन करावा लागतो. अनेकदा काही जणांच्या घरामध्ये दोन पेक्षा जास्त खोली असतात अशावेळी प्रत्येक खोली मध्ये माणसांचा वावर असणे अनेकदा अशक्य होत नाही परंतु अशावेळी तुम्ही त्या घरामध्ये निदान एकदातरी दिवसभरातून झाडू मारायला हवा कारण की झाडू ही प्रत्यक्ष लक्ष्मी स्वरूप असते आणि ज्या घरांमध्ये झाडू मारला जातो त्या घरामध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते आणि म्हणूनच जर एखादी खोली बंद असेल तर अशा घरांमध्ये एक वेळ तरी घरामध्ये झाडू मारणे अत्यंत गरजेचे आहे.

जरी झाडू मारणे तुम्हाला शक्य नाही झाले तर त्या घरांमध्ये एक दिवा आणि एक अगरबत्ती नक्की लावा. असे केल्यामुळे त्या घरातील वातावरण चैतन्यमय बनते आणि जर त्या घरांमध्ये दुष्ट वाईट शक्ती असेल तर त्या शक्‍तींचा नाश करण्यासाठी व त्या शक्तींना बाहेर काढण्यासाठी या गोष्टी उपयुक्त ठरतात. विशेष करून पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशेला असणाऱ्या खोल्या कधीच बंद ठेवू नका.

त्या खुल्या नेहमी वापरण्यात असायला हव्या ,त्या खोलीमध्ये नेहमी कोणाचे तरी वावर असायला हवा तरच आपल्यासाठी चांगले अन्यथा या सगळ्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि तुमच्या सदस्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतील आणि एकदा का या वाईट शक्तींना आश्रय मिळाल्यास त्या सहज लवकर ती जागा सोडत नाही आणि म्हणूनच असे काही आपल्या बाबतीत घडू नये असे वाटत असेल तर जर तुमच्यामध्ये जास्त काही खोल्या असतील तर त्या खोल्यांमध्ये निदान काही काळ तरी आपले वास्तव्य असायला हवे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *