या वस्तूचे दान कधीच करू नका; नाहीतर सोसावे लागेल भारी नुकसान.!

या वस्तूचे दान कधीच करू नका; नाहीतर सोसावे लागेल भारी नुकसान.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोणत्याही धर्मामध्ये दान करण्याचे करण्याचे खूप महत्त्व असते तसेच दानापेक्षा कोणतेच मोठे पुण्य नाही. दान करण्याची परंपरा खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दान केल्याने शांतीच मिळत नाही तर त्याचबरोबर ग्रह दोष ,बाधा सुद्धा नष्ट होतात परंतु कळत नकळत अनेकदा आपण अशा वस्तूंचे दान करत बसतो ज्यामुळे आपल्या पुण्यात वाढ तर होत नाही परंतु आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी, बाधा संकट येऊ लागतात.

अशा कितीतरी वस्तू आहेत त्या दान म्हणून कोणाला देऊ नये परन्तु आपल्या हातातून या चूका होऊन जातात म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण आपण हे जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या वस्तू आहेत की त्यांचे दान करू नये. त्यातील सर्वात पहिली वस्तू आहे लोणचे. लोणचे हा असा एक पदार्थ आहे तो लवकर खराब होत नाही. याचा अर्थ काय झाला स्थिर लक्ष्मी. काही स्त्रिया म्हणतात आमच्या घरात लोणचे टिकत नाही ,लोणचे खराब होते तर अशा घरांमध्ये लोणचे का टिकत नाही.? कारण त्या घरांमध्ये दोष असतो.

त्यांच्या घरामध्ये खूप काळापर्यंत लोणची टिकते काय समजावे त्या घरांवर माता महालक्ष्मीची कृपा आहे म्हणून लोणचे कोणालाही देऊ नये. तसे तर स्त्रिया लोणचे बनवल्यावर एकमेकांना देत असतात. तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता पण त्या बदल्यात थोडेफार पैसे सुद्धा घ्या. त्याच बरोबर लोणचे आंबट असते म्हणून लोणचे एकमेकांना दिल्याने नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो त्यात आंबटपणा निर्माण होतो. दुसरी वस्तू म्हणजे पांढरी तीळ.

काळे तीळ श्रीहरी विष्णूचे प्रतिक प्रतिक मानले जाते परंतु पांढरे तीळ श्री लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे आणि पांढऱ्या तिळाचे दान करणे म्हणजे आपल्या जीवनातून लक्ष्मी निघून जाणे असे होते. आजपर्यंत ही चूक तुम्ही जर केली असेल तर ती सोडून द्या आणि यापुढे काळजी घ्या. पांढऱ्या तिळाचे दान खूप सावध राहून करावे तसेच त्या काळे तिळाचे दान केल्याने आपल्या जीवनातील अडचणी संकट दूर होतात. तिसरी वस्तू म्हणजे धणे. धणेे हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत.

ज्या घरामध्ये धणे असते ,कोथिंबीर लावलेली असते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते म्हणून धन्याचे दान कधीही करू नये. कोणी धने किंवा कोथिंबीर मागे घेतली तर त्या बदल्यात पैसे घ्या मगच त्यांना ती वस्तू द्या.पुढील वस्तू म्हणजे जुने कपडे. तसेच आधुनिक युगामध्ये नवीन नवीन कपडे नेहमी विकत घेतले जातात मग जुने कपडे तसेच पडून राहतात आणि आपल्याला लहान होतात. असे कपडे आपण करू शकतो परंतु शकतो परंतु हे कपडे धुऊन व्यवस्थित करूनच नंतर करूनच नंतर दान करावे. आपले जुने कपडे धुऊन तसेच्या तसे न देता दिले गेले तर ततर असे केल्याने आपले नशीब वाटले जाते.

आपले भाग्य इतरांकडे आकर्षित होते म्हणून वापरलेले कपडे धुतले नंतरच दान करा. पुढील वस्तू आहे दही. दही सकाळ, संध्याकाळ, दुपार अशा कोणत्याही वेळी चुकून दही कुणाला दान करू नये. जर कुणाला दही दान केली तर आपल्या घरातील लक्ष्मी इतरांच्या घरात निघून जाते. पुढील वस्तू म्हणजे धारदार व टोकदार वस्तू म्हणजेच सुरी, कात्री ,सुई यासारख्या धारदार वस्तू कुणालाच गिफ्ट म्हणून देऊ नये त्याच बरोबर कोणाला दान सुद्धा या वस्तू देऊ नये. या वस्तू दान केल्याने आपल्या घरातील सुख शांती निघून जाते तसेच ज्यांना आपण या वस्तू दिले तर त्या व्यक्तींबरोबर चे आपले संबंध सुद्धा बिघडतात.

पुढील वस्तू म्हणजे स्टीलचे भांडे. स्टीलचे भांडे हे दिसायला अतिशय आकर्षक व फॅन्सी असतात म्हणून आपण इतरांना गिफ्ट म्हणून या वस्तू देत असतो परंतु ज्योतिष शास्त्रानुसार स्टीलचे दान करणे खूप अशुभ मानले जाते.स्टीलच्या वस्तूंचे दान दान केल्यास आपल्या घरातील सुख व शांतता भंग पावते. घरात भांडण व वादविवाद होतात म्हणून स्टीलचे वस्तू दान करू नये. पुढील वस्तू आहे प्लास्टिकचे वस्तू. प्लास्टिकच्या वस्तू कोणालाही गिफ्ट व दान करू नये कारण की प्लास्टिकच्या वस्तू ह्या पूजा विधी व ज्योतिष शास्त्र मध्ये अशुभ मानला गेलेला आहे त्याचबरोबर प्लास्टिक हे अशुद्ध असल्याने केले गेलेले दान पवित्र मानले जात नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *